शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 15:03 IST

Heavy Rain Hits Marathwada : अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड

ठळक मुद्देप्राथमिक पाहणीचा अंदाजक्षेत्र कमी-जास्त होण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टरवरील पिकांचा अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain Hits Marathwada ) चिखल झाला आहे. प्राथमिक पाहणीच्या अंदाजानुसार ही आकडेवारी समोर आली असून, आठ दिवसांनंतर किती क्षेत्रफळाचे नुकसान झाले हे समोर येईल, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, मका, सोयाबीनसह कडधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे.

प्राथमिक पाहणीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख ७२ हजार १५ हेक्टर, जालना जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ६६६, परभणी एक लाख ६१ हजार २७, हिंंगोली जिल्ह्यात आठ हजार ९१९, तर नांदेड जिल्ह्यात तीन लाख ७१ हजार ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील पाच लाख १९ हजार ४२५ हेक्टर, लातूर सहा हजार २२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १४ लाख ७४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेल्याचे यातून दिसते आहे. आयुक्तालय सूत्रांनी सांगितले, २० टक्क्यांच्या आसपास पंचनामे झाले आहेत. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण होणे शक्य आहे. सध्या नजर अंदाजानुसार पंचनामे होत आहेत. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड आहे. त्यामुळे प्राथमिक आकडेवारीत कमी-अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.

हेही वाचा - मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात

मराठवाडा @ ८१८.८ मिलीमीटर; १३९ मि.मी.अतिरिक्त पाऊसमराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या ६७९.५ मिलीमीटर तुलनेत १५ सप्टेंबरपर्यंत ८१८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा १३९.३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. यामुळे विभागातील खरीप हंंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि उस्मानाबादवगळता सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. सर्व जिल्ह्यांची वार्षिक सरासरी पूर्ण झाल्याचे पावसाच्या नोंदीवरून दिसते आहे. तीन दिवसांपासून विभागात पावसाने उघडीप दिली आहे.

विभागात जिल्हानिहाय झालेला पाऊस असाजिल्हा-----वार्षिक सरासरी-----झालेला पाऊस-----टक्केवारीऔरंगाबाद --५८१.७ मि.मी.-----७१९.८ मि.मी.------१२३.७४ टक्केजालना---- ६०३.१ मि.मी.------८६४.३ मि.मी.------१४३.४१ टक्केबीड-----५६६.१ मि.मी.------७७१.५ मि.मी.-------१३६.२८ टक्केलातूर----७०६.०० मि.मी.-----७२७.०० मि.मी.------१०२.९७ टक्केउस्मानाबाद--६०३.१ मि.मी.----६३९.९ मि.मी.-------१०५.६० टक्केनांदेड-----८१४.४ मि.मी-----९९१.३ मि.मी.-------१२१.७२ टक्केपरभणी----७६१.३ मि.मी.----९०३.४ मि.मी.-------११८.६७ टक्केहिंगोली ---७९५.३ मि.मी.-----८८४.८ मि.मी.------१११.२५ टक्केएकूण----६७९.५ मि.मी. -----८१८.८ मि.मी.------१२०.५० टक्के

हेही वाचा - 'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेती