शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्या बाबांनाही न्याय मिळेल का ?

By admin | Updated: June 18, 2017 00:32 IST

अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या मायावी ...

वतन लोणे । लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या मायावी दुनियेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जगभरातील तरूण आज कुठल्या ना कुठल्या ‘डे’ची वाट पाहत असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’चे आयोजन करण्यात येते. वडिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरूवात अमेरिकेत करण्यात आली. लहानपणापासून मुलांना कायम धाकात व बंधनात ठेवणारा पिता, प्रपंचाची जबाबदारी समर्थपणे पेलत असताना जबाबदारीच्या ओझाने असेल किंवा समाजाच्या दडपणामुळे, रडताना कधीच दिसत नाही. कुटुंबप्रमुख, कर्ता पुरूष, कुटुंबाचा आधार अशी अनेक बिरूदे सन्मानाने मिरवणारा हा बाप, मुलगी सासरी जाताना मात्र डोळ्यांत पाणी आणतो, रडतो. तेव्हा तो खूप अगतिक वाटतो. मनात चिंता असते, मात्र तरीही ओठावर सतत हसू ठेवणारा हा वधूपिता काळजाच्या तुकड्याला अनोळखी कुटुंबाच्या हवाली करताना अगतिक न होईल तरच नवलच! आयुष्यभर कुटुंबासाठीच झटणाऱ्या पित्याला सलाम करण्याचा ‘फादर्स डे’ हा अनोखा दिवस. आईचे प्रेम आणि वडिलांची माया मिळाल्याखेरीज मुलांचे भवितव्य उज्ज्वल होत नाही. मात्र, सध्याच्या काळात पती-पत्नींचे घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा प्रकरणात मुलाची जबाबदारी व त्याचा ताबा हे कायदेशीर प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. कौटुंबिक न्यायालयेही आईकडेच मुलांचा ताबा देतात. वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत मुलाचा आईकडे ताबा असतो. नंतर पुन्हा मुलगा म्हणेल त्याच्याकडे ताबा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, सतत आईच्या संपर्कात असल्याने बऱ्याचशा घटनांमध्ये नंतरही मुलगा आईकडेच राहणे पसंत करतो. सतत वडिलांच्या विरोधातच ऐकत असल्यामुळे वडिलांबद्दलची नकारात्मक मानसिकता तयार होत जाते. त्यामुळे उभ्या आयुष्यात वडील व मुलगा यांच्यातला दुरावा कमी होत नाही. पयार्याने या नातेसंबंधावर अत्यंत वाईट परिणाम होतात. अविश्वसनीय वाटत असलेली ही परिस्थिती आज बरेच वडील जगत आहेत. भारतीय परिवार बचाव संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्राद्वारे या बाबीची कल्पना देण्यात आली आहे. मुलांचा ताबा न मिळालेल्या वडिलांना मुलांचा पूर्ण खर्च सोसावा लागतो. मात्र, या बदल्यात वडिलांना मुलासोबत महिन्यातून एकदाच ३० मिनिटे ते १ तास भेटता येते. ही भेट सार्वजनिक ठिकाणीच घेतली पाहिजे, असेही बंधन आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने अशा प्रकरणांत निर्णय देताना वडिलांच्याही भावनांचा विचार करावा, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. नाहीतर भारतीय समाज व्यवस्थेत वडिलांंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा आईकडे गेल्यानंतर वडिलांना मुलाला भेटणेही कठीण होऊन बसते. मुलाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. एकप्रकारच्या दडपण व नैराश्याखाली वडील वावरू लागतो. तो कोणाला काही सांगूही शकत नाही व मोकळेपणाने रडूही शकत नाही. वडिलांनाही भावना असतात, हे लक्षात घेतल्यास समोपचाराने असे प्रश्न सुटू शकतात.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर,जिल्हाध्यक्ष, भारतीय परिवारबचाव संघटना, चंद्रपूर.