शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भ्रष्टाचारासंबंधी कारवाई केव्हा होणार ?

By admin | Updated: March 28, 2016 01:00 IST

तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.

बी.यू.बोर्डेवार/शंकर मडावी ल्ल राजुरातालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे भेंडवीचे ग्रामवासी आनंद गेडाम व गावातील नागरिक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून निवेदन देणार आहे.राजुरा तालुक्यातील भेंडवी गावात फेरफटका मारला असता गावातील नागरिकांनी गावाच्या समस्या पत्रकारांसमक्ष मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ५८ लाखांची पाण्याची टाकी मागील दोन वर्षापासून धूळ खात आहे. राजुरा येथील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकी बांधकाम करताना रोख पुस्तकात अजूनही नोंदी नाही. रोख पुस्तक कोरे आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. अजूनपर्यत ही पाण्याची टाकी ग्रामवासीयांना हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे येथील महिला पाण्यासाठी त्रस्त आहेत.या ठिकाणी अंबुजा फाऊंडेशनने एक बंधारा बांधला. त्या बंधाऱ्याला लोखंडी दारच नाही. या बंधाऱ्याच्या बाजुला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजना राजुरा तालुक्यात राबविण्यात आली. ती योजना रोजगार हमी अर्धे-तुम्ही अर्धे आम्ही या प्रमाणेच असून वृक्ष नसताना वृक्षाच्या देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीने केलेला आहे. सोलर लाईट, टावर बंद पडलेले असून शौचालय तयार करण्यासाठी आणलेल्या विटा धूळ खात पडलेल्या आहे. अस्वच्छ नाल्या असून आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेली नाही. या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या. शासकीय अधिकारी यांनी अहवाल दिला. परंतु राजुराचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनपर्यंत तक्रार झालेली नाही. राजुराचे संवर्ग विकास अधिकारी अहवाल पाठवून मोकळे झाले. चंद्रपूरचे संबंधित अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करू, असे पोलीस अधिकारी म्हणतात. लाखोंचा भ्रष्टाचार होवूनही कारवाई होत नसल्याचे पाहून गावातील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत.पोलीस पाटलांवरच आहेत गुन्हे दाखलराजुरा : पोलीस पाटील पोलिसांची व त्या गावाची चांगली प्रतिमा सांभाळीत असतो. परंतु पोलीस पाटलावरच गुन्हे दाखल असेल तर ते गावाला काय न्याय देणार. अशीच परिस्थिती भेंडवीत आहे. त्यांना पोलीस पाटील करू नये, यासाठी येथील १०० नागरिकांनी तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की संतोष सलाम यांच्यावर गुन्हे दाखल असून अशा व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नियुक्ती केल्यास गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊन गावातील वातावरण दूषित होईल. आनंद गेडाम, भगवान मडावी, सुभाष उईके, सुनीता गेडाम, शशिकला परचाके, पुष्पा गेडाम, जंगुबाई मंगाम यासह शंभर नागरिकांनी तक्रार करूनही संतोष सलाम हे पोलीस पाटील नियुक्त झाले. या पोलीूस पाटलावर भादंवी ४२०, ४६८, ४७१, २०० अन्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा भादंवीच्या ५०९, २९४, ५०६, ३२३, १४३, १४७, ४२७, २९४, ६०६, १४३, ४७७, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातून ते निर्दोष मुक्त झाले. या तक्रारीमध्ये जातीचा घोळ असल्याचेसुद्धा म्हटले आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीस पाटील कसे नियुक्त केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेसुध्दा २४ नोव्हेंबर २०१५ ला याची रितसर तक्रार करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत साधी चौकशीही झाली नाही, या बद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.