शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

भाजीपाल्याचे भाव कडाडले गृहणीचे बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 5:00 AM

आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देकांदा ७० रुपये किलो। आर्थिक गणित जुळविताना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : यंदा पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पिके उशीरा निघत असल्याने बाजारात अन्य राज्यांतून भाजीपाला आयात करावा लागत आहे. त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात आवश्यक असणारा भाजीपाला कडाडल्याने सामान्य गृहीणींचे बजट बिघडले आहे. रोजीरोटीचा व्यवसाय करून हातावर आणून पानावर खाणाºया गरीब व सामान्य कुटुंबानचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिल्लर ग्राहकांना भाजीपाला प्रती पाव विकत घ्यावा लागत आहे. त्यातच कांद्याने ७० पार केल्याने मोठी पंचाईत होत आहे. त्यासोबच पालक १५ रुपये, अद्रक ३० रुपये, काकडी १० रुपये, तोंडळे १५ रुपये , सिमला मिर्ची २० रुपये, फूल कोबी २० रुपये, पत्ता कोबी १५ रुपए , ढेमस २० रुपये, सांबार ६० रुपये , मेथी २० रुपये, चवळी भाजी २० रुपये, कारले १५ रुपये, चवळी शेंगा २० ते २५ रुपये, टमाटर १५ रुपये, भेंडी १५ रुपये, वांगे २० रुपये, लौकी १० रुपये, गाजर ३० रुपये, बीट २० रुपये, कांदे २० रुपये, आलू सात रुपये, मेथी २५ ते ३० प्रमाणे कमीजास्त भावात भाजीपाला विकला जात आहे. त्यामुळे पूर्वी शंभर ते २०० रुपयात होणारा बाजाराला आता ४०० रुपये लागत आहेत.आपल्या भागात भेंडी, वांगे, चवळी, पालक हाच भाजीपाला पिकतो. आपल्याकडे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश वगैरे भागातून भाजीपाला येतो. शेतकऱ्यांचा भाजीपाला निघायचा असल्याने भावात थोडाफार फरक पडत आहे. शेतकºयांचा माल बाजारात आल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे.- गुलाब पाकमोडे, भाजीपाल्याचे ठोक व्यापारी,भद्रावती

टॅग्स :Marketबाजार