शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद

By admin | Published: September 30, 2014 11:35 PM

कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लखमापूर : कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. याचे मुख्य केंद्र गडचांदूर-भोयगाव मार्गावरील कवठाळा येथे आहे. या योजनेद्वारे १७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पाणी पुरवठ्याचा सामना या गावांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. १० वर्षापूर्वी या गावांसाठी सदर पाणी पुरवठा योजना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाणी पुरवठा झाला व पाणीटंचाई रोखता आली. मात्र त्यानंतर आजतागायत पाईपलाईन, दुरुस्ती, पाईपलाईन विस्तार व गावातील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे नसली तरी ग्रामपंचायतीला कर भरावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक हलबल झाले आहे. या गावातील महिला गावातील सार्वजनिक बोअरवेल, विहिरीतून काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा उपसा करीत आहेत. परंतु पाण्याचा साठा मुबलक नसल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर कुठे एकाच बोअरवेलवर गावातील सर्वच महिला पाण्यासाठी गोळा होत असल्याने तंटे वाढत आहेत. गावातील बोअरवेलही मोळकळीस आल्या आहेत. सदर गाव मुख्य मार्गावर असल्याने व लोकसंख्या बघता पाण्याचा साठा मुबलक असणे गरजेचे आहे. मात्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. (वार्ताहर)