शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्ह्यात साडेअकरा हजार सिंचन विहिरींचा लक्ष्यांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:46 IST

जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या : ३० जून २०२० पर्यंत वाढविली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.सिंचन विहिर धडक कार्यक्रम अंतर्गत विविध निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जातो. ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. ११ सप्टेंबर २०१६ रोजी योजनेची सुरूवात झाली. जिल्ह्यातील सिंचनाची व्याप्ती कमी असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पुढे येत आहे. मात्र, जिल्ह्याचे लक्षांक व शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्हा परिषद जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत विहिरींचा लाभ घेत असताना शेकडो शेतकºयांना अडचणी येत होत्या. परिणामी, योजनेविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. यावर पर्याय म्हणून नियोजन विभागाने जिल्ह्याच्या लक्षांकामध्ये १ हजार ७०० विहिरींनी वाढ केली. हे लक्षांक दोन टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटकाशेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम २०१६ पासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १८ तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटका बसतो. काही अधिकारी कागदीघोडे नाचविण्यातच वेळ घालवितात. अंमलबजाणीत त्रुटी राहात असल्याने विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.टंचाईच्या झळाशेतातील विहिरींमधील पाण्याची पातळी खालावल्याने रबी पिक घेणारे शेतकरी सध्या हैराण झाले आहेत. विहिरींवरील कृषीपंप अर्धा ते एक तास चालविल्यानंतर पाण्याची पातळी पूर्ण कमी होते. पूढील महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे लक्षांक मंजूर करणे पूरेसे नाही तर सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.