शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची काहिली वाढली

By admin | Updated: March 27, 2016 00:32 IST

चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे.

दुपारी वर्दळ कमी : पारा ४० अंशापार, अडगळीतले कुलर निघाले बाहेरचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे. होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या पंधरवाड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला आहे. आता तर मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली चंद्रपूरकरांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४०.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल शुक्रवारीदेखील ४०.१ अंश सेल्सीयस तापमान होते. मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ४० अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सोडले तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक नानाविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे नागरिकांनी सुरू केले आहे.त्यामुळे टोप्यांची दुकाने, गागल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय चंद्रपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत. या रसवंत्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्याची पातळी खालावलीदुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणिकगड पहाडावरील अनेक गुड्यातील लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत.मडक्यांची मागणी वाढलीउन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार चाळीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहे. पूर्वी ४०-५० रुपयात मिळणाऱ्या माठाची किंमत आता शंभर-दीडशे रुपयांवर गेली आहे.होळीच्या आदल्यादिवशी सर्वाधिक तापमानहोळीच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ मार्चला चंद्रपुरात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. त्यानंतर सुर्याचा पारा कमी झाला. तरीही तो ४० अंशापार आहेच.