शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत समाधान आणि नाराजीही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

अर्थसंकल्प नव्हे भुलभुलय्या कोरोनामुळे रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागपुरातील मेट्रोचा उल्लेख सोडल्यास ...

अर्थसंकल्प नव्हे भुलभुलय्या

कोरोनामुळे रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागपुरातील मेट्रोचा उल्लेख सोडल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही. केवळ आत्मनिर्भरतेचा जयघोष करण्यात आला. तुमचे तुम्ही पाहून घ्या सरकारची जबाबदारी संपली, हा अर्थ काढावा अशीच केंद्र सरकारची धोरणे आहेत. आकड्यांचा खेळ मांडून सरकारने दिशाभूल केली आहे.

- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर

जनहितकारी अर्थसंकल्प

कोरोनाशी संघर्ष करून केंद्र सरकारने जनहितकारी, सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातील जनहितकारी तरतुदी समजावून घेतल्यास सर्व स्तरातून स्वागत होईल.

- हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री

मोदी सरकारचा लॉलिपॉप

केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर तरतूद करून मोदी सरकारने लॉलिपॉप दिला आहे.

चार राज्यासाठी २.२७ लाख कोटीच्या सुविधांसाठी तरतूद केली. मात्र, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी व रोजगार निर्मितीसाठी काही नाही.

-बाळू धानोरकर, खासदार चंद्रपूर

अर्थसंकल्पात किरकोळ तरतुदी

बजेटमध्ये रोजगार व शेतकऱ्यांना सोयीस्कररीत्या बाजूला सारले. कृषी कायद्याविरोधात आंदोलन असल्याने अपेक्षा होती. परंतु, किरकोळ तरतुदीमुळे काही साध्य होणार नाही. अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे.

-किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर

महिलांसाठी काहीच नाही

गृहिणी विश्वास ठेवून आपला पैसा जमा करून एलआयसीत गुंतवणूक करतात. परंतु, एलआयसी विकण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. महिलांच्या कल्याणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काहीच नाही. आत्मनिर्भर भारत करणारे मोदी सरकार महिलांना काही देऊ शकले नाही.

-प्रतिभा धानोरकर, आमदार, भद्रावती

कृषी क्षेत्राचा अपेक्षाभंग

अर्थसंकल्पात शेतीसाठी काही किरकोळ तरतुदी आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मरणासन्न असताना त्यावर काही उपाय नाही. शेतकऱ्यांसाठी ‘खोदा पहाड निकला चुहा’असा अर्थसंकल्प आहे.

-अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा

शेतीसाठी १६५० लाख कोटी

शेतकरी आंदोलन व आगामी चार राज्यातील आगामी निवडणुकांचे प्रतिबिंंब उमटले आहे. त्यामुळेच शेतीसाठी १६५० लाख कोटींची तरतूद होऊ शकली. आरोग्याकडेही लक्ष दिल्याचे दिसून येते. बजेट नुकसान ६. ८ टक्क्याहून अधिक असल्याने महागाई वाढू शकते.

-हर्षवर्धन सिंघवी, अध्यक्ष चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स

लघु उद्योगांकडे दुर्लक्ष

कोणतेही नवीन कर लावले नाही. मात्र, लघु उद्योगाच्या हितासाठी ठोस तरतुदी नाहीत. देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या लघु उद्योगाची मोठी उपेक्षा झाली आहे. सर्वसामान्यांचा समावेश बजेटमध्ये झाला नाही.

- मधुसूदन रुंगठा, अध्यक्ष एमआयडीसी, चंद्रपूर

रोजगार निर्मितीचा वेग वाढेल

आरोेग्य व पर्यावरणासंबंधित तरतुदी उपयुक्त आहेत. उद्योग कॉरिडोरमधून रोजगार निर्मितीचा वेग वाढेल. मूलभूत सुविधा वाढतील. ज्येष्ठ नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून मुक्ती दिली. गरिबी उन्मूलन व शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचे बदल होतील.

- प्रतीक सारडा, सीए चंद्रपूर

अर्थसंकल्पनातून ना नफा ना तोटा

कररचनेत मोठा बदल झाला नाही. कोरोना काळातील हा अर्थसंकल्प ना नफा ना तोटा अशा स्वरूपाचा आहे. सावध पवित्रा घेऊन काही तरतुदी केल्या. याचा देशाला काही प्रमाणात लाभ होऊ शकेल.

- सदानंद खत्री, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, चंद्रपूर

महागाई वाढविणारा अर्थसंकल्प

केंद्राच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी सवलती दिल्या नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. आयकर सवलतीत बदल नसल्याने कर्मचारीवर्गाची नाराजी ओढवली आहे. रोजगार निर्मितीवरही भर दिला नाही. महागाई वाढतच राहील. निराशादायक असा हा अर्थसंकल्प आहे.

- डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर