शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM

कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे.

ठळक मुद्देबेरोजगारीवर मात : शहरातील तरुणांचे लक्ष आता शेती व्यवसायाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शहरातील तरुण गावाकडे परतत आहे. हाताला काम नसल्याने यातील अनेक जण शेतीकडे वळत असून आता गावात शेतीवरच त्यांची भिस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील अनेक तरुण आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परत येत आहेत. मात्र, त्यांना तूर्त गावाकडे येण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने ही कुटुंबे शहरात अडकली आहे.कोरानामुळे सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याचा विपरीत फटका ग्रामीण भागालाही बसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मागणी नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यातच मोठ्या संख्येने तरुणांचे लोंढे आता ग्रामीण भागात जात आहे. जगण्यासाठी किमान आवश्यक सुविधा तरी गावातच मिळेल, अशी आशा या तरुणांना आहे.मागील काही दिवसात शेतीची चांगली अवस्था नाही. मात्र भविष्यात शेतीचे चांगले दिवस येथील या आशेवर अनेक तरुणांनी आता पुन्हा शेतीकडे आपले लक्ष केंद्रीत करीत आहेत.शहरातून आलेल्या काही तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरुन शेतीपूरक व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. छोटे-छोटे कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. कोरोनानिमित्ताने का होईना पण शेतीला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील, असा विश्वास ग्रामीण भागातील शेतकºयांना आहे.शेतीला येतील चांगले दिवसकोरोनाते मोछे संकट असले तरी शेतीला पुन्हा चांगले दिवस येण्याची चिन्ह ग्रामीण नागरिकांनी आहे. घरातील तरुण नोकरीनिमित्ताने पुणे, मुंबईसारख्या शहरात गेले. त्यामुळे शेती करण्यासाठी घरातही माणसे नाहीत आणि मजुरही मिळत नाही, अशी अवस्था आहे. परंतु आता शहरातील गेलेल्या तरुणांनी शेतीच उत्तम असल्याचे मान्य केले आहे, तर व्यापार दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ ठरवत आहे. त्यामुळे पूर्वीचे सूत्र पुन्हा लागू होणार आहे.गाव खेड्याला कायम दुय्यम समजणारी मंडळी कोरोनाचा धसका घेऊन आपला गाव बरा म्हणू लागली आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव शहरी भागात झपाट्याने वाढत असल्यामुळे नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी आता गावाकडचा रस्ता धरला आहे. शहरातील माणसांचा ग्रामीण भागात वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाची भीती बळावत आहे. स्थानिक प्रशासनासह वैद्यकीय विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहे.

टॅग्स :agricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्या