शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

फळे,पालेभाज्यांचे भाव उतरले,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST

गृहिणी आनंदात : भाजी बाजारात गर्दी वाढली बल्लारपूर : भाजी बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पालेभाज्यांचे भाव ...

गृहिणी आनंदात : भाजी बाजारात गर्दी वाढली

बल्लारपूर : भाजी बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमालीचे गडगडले. फळेही शंभरच्या आतच असल्यामुळे दिवसभर पालेभाज्या व फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहावयास मिळाली.

बल्लारपूर शहरातील भाजी मंडईमध्ये सर्व भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ज्या भाज्यांची किंमत १५ दिवसाअगोदर अव्वाच्यासव्वा होती, त्या भाज्या स्वस्त झाल्या होत्या. टमाटर १० रुपये किलो, कोबी १५ रुपये किलो, मिरची २० रुपये किलो, कोथिंबीर ५ रुपये जुडी, मेथी ५ रुपये, वाटाणा २० रुपये किलो, गाजर १० रुपये किलो, मिरची २० रुपये किलो या भावाने विकल्या जात होते. सायंकाळी तर जो भाव मिळेल त्याभावाने भाजी विकून भाजी विक्रेत्यांनी दुकाने खाली केली. यामुळे पालेभाज्या उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे.

फळांचे भाव

जी फळे मागील महिन्यात महाग होती, ती फळेही स्वस्त झाली आहेत. २०० रुपये किलो मिळणारे डाळिंब १६० रुपये किलो, पपई ३० रुपये किलो, केळी २० रुपये डझन, मोसंबी ६० रुपये किलो, चिकू ६० रुपये किलो, सफरचंद १४० रुपये किलो, अंगूर ८० रुपये किलो असे सध्या फळांचे भाव सुरू आहे.

कोट

यंदा पालेभाज्यांचे उत्पादन जास्त प्रमाणात असल्यामुळे गावखेड्यातील भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात मंडईत पालेभाज्या आणत आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत भाजीपाला स्वस्तच राहणार आहे.

- अमित पाझारे, भाजी विक्रेते,बल्लारपूर.

कोट

या आठवड्यात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याने गृहिणींना सोयीस्कर झाले आहे. फक्त याच महिन्यात पालेभाज्यांचा स्वाद घेणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

- सत्यभामा भाले, गृहिणी, बल्लारपूर

कोट

सध्या बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पपई, केळी, अंगूर, चिकू, सफरचंद, संत्री घेण्यासाठी सामान्य जनतेची गर्दी वाढली आहे. पुढच्या महिन्यात मात्र किमती वाढण्याची शक्यता आहे.

- बाबाखान, फळ विक्रेता, बल्लारपूर.