शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

बाजार समितीतच पिकाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे.

ठळक मुद्देओले असल्याचे कारण : ३७१० रुपये हमीभाव, खरेदी दोन हजारात

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला खासगी व्यापाऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची डोळ्यादेखत फसवणूक करण्यात येत आहे. मात्र याकडे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ओले असल्याच्या नावावर खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करीत आहे. कवडीमोल भावात खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सोयाबीनला ३ हजार ७१० रुपये हमीभाव असताना सोयाबीन ओले असल्याच्या नावाखाली खासगी व्यापारी सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. एवढया मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची खासगी व्यापारी लूट करीत असल्याने सरकारी यंत्रणा मात्र गप्प आहे. शेतकºयांचे कैवारी समजले जाणारे राजकीय पुढारी शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला अजिबात तयार नाही. परतीच्या पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा सुल्तानी संकट शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कोणी वालीच उरला नसल्याने शेतकरी नाईलाजाने सोयाबीनची विक्री करीत आहे. यात व्यापाºयांचे फावत आहे.नाफेडची सोयाबीन खरेदी बंदचराजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी नाफेडची खरेदी करण्यात येते. मात्र दिवाळी होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी नाफेडची शासकीय खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापारी सोयाबीनचा लिलाव दुपारनंतर करीत असल्याने शेतकºयांना नाईलाजाने रात्रीपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती