शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष

By admin | Updated: April 20, 2015 01:12 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्जाचा बोझा अजूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कमी झाला नाही. रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच केले आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर बरसेल व पाऊसही चांगला होईल, असा अंदाज वर्तविल्याने नेहमीच आशावादी असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता नव्याने पल्लवित होऊ पाहत आहे. कृषी विभागानेही खरीपासाठी नियोजन पूर्ण केले आहे.२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेती खरडून निघाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. काही शेतकऱ्यांना तर खरीपातील एक दानाही हाती मिळाला नाही. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मायबाप सरकार धावून आले म्हणून शेतकऱ्यांनीही दु:खावर पांघरून घातले. मात्र राज्य शासनाची ही मदत झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजी होती. काही शेतकऱ्यांनाही अद्यापही ही मदत मिळाली नाही, अशी ओरड होत आहे. शासकीय मदतीतून शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे जराही हलके झाले नाही. उलट कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना वर्षभर त्याची दमछाक झाली. त्यानंतर मागील खरीप हंगामात वेळेवर मान्सून बरसला. आतातरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. मात्र वरूणराजाने अवकृपा दाखविणे सोडले नाही. प्रारंभी पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. कित्येक दिवस पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. कशबशी पेरणी केल्यानंतर ऐन पीक भरात येत असतानाही पुन्हा पावसाने दडी मारली. यातही शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. हे नुकसान रबीतही भरून निघाले नाही. रबी हंगामात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.आता काही दिवसात पुन्हा खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. यावेळी हवामान खात्याने मान्सून वेळेवर बरसणार असे भाकित केले आहे. याशिवाय पावसाळ्यात वरूणराजाची कृपा चांगली असणार आहे, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या वृत्तामुळे हवालदिल शेतकऱ्यांची थोडीशी आशा पल्लवित होऊ लागली आहे. यंदा कृषी विभागानेही आपले खरीपाचे नियोजन झटपट पूर्ण केले आहे. यावेळी चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावेळी पुन्हा कापसाचा पेरा वाढणार असे दिसून येत आहे. कापसाचे १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तर धान १ लाख ७७ हजार ६८ हेक्टर व १ लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होणार आहे. लागोपाठ दोन वर्ष खरीपाने खिसा भरण्याऐवजी खिशाला कात्री लावली होती. यावर्षी तर खरीपाने भरभरून द्यावे, अशा आशाळभूत नजरेने शेतकरी खरीप हंगामाकडे बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)