शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात एकही विद्यार्थी पॅाझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा ५० टक्के तत्त्वावर २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ...

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा ५० टक्के तत्त्वावर २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे हजेरीपटावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंद आहे. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ४३ हजार ६२३ विद्यार्थी शाळेत येत आहेत. सुदैवाने शाळा प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली नाही.

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्त्वावर ज्या विद्यार्थ्यांनी संमतिपत्र दिले त्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ४३ हजार विद्यार्थी शाळेत येत आहेत. शाळा प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याने सुदैवाने दीड महिन्यात जिल्ह्यात एकही कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आले नाही.

कोट

शासनाच्या नियमांप्रमाणे ५० टक्के तत्त्वावर शाळा सुरू आहेत. कोरोनासंदर्भात काळजी घेऊन शाळा सुरू आहेत. त्याचे फलित म्हणून दीड महिन्यात एकही शालेय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाला नाही. त्यामुळे पालकही जागृत झाले असून पाल्यांना शाळेत पाठवत आहेत. दररोज ४५ हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती राहत आहे.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी

बॉक्स

शाळांतील उपस्थिती

तालुकासुरूउपस्थिती

चंद्रपूर १०२ ७५०७

भद्रावती ३३ २६२४

वरोरा ४९ ३१२३

बल्लारपूर ३२ १८२०

मूल ३३ ३०१६

राजुरा ४३ २०३४

कोरपना ३६ ३२६७

जिवती २६ ११७९

गोंडपिपरी १९ १६३२

पोंभुर्णा १५ ८२३

सावली २४ ३५८९

सिंदेवाही २६ २३१२

नागभीड ३० ३१९०

ब्रह्मपुरी ३५ ३७९३

चिमूर ४६ ३७१४