शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

By admin | Updated: May 22, 2015 01:20 IST

शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे.

गडचांदूर : शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे. अनेक पर्यटकही या ठिकाणी भेटी देतात. मात्र हे स्थळ पर्यटनाच्या दर्जापासून वंचित असल्याने विकास थांबला आहे.पहाटे सकाळी व सायंकाळी नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते. शासनाने या धरणाला पर्यटनाचा दर्जा देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी नागरिकांची मागणी आहे. अंमलनाला धरण निसर्गरम्य परिसरात आहे. या परिसरात पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटते. या तलावाला तसेच जवळच असलेल्या प्राचीन माणिकगड किल्ला, विष्णु मंदिर, शंकरदेव मंदिर, माता मंदिरला दरवर्षी हजारो नागरिक भेटी देतात. पर्यटनक्षेत्र म्हणून या परिसराचा विकास झाला. पर्यटकाच्या संख्येत आणखी वाढ होईल. निसर्गाने विविध रंगाची उधळण केलेल्या व वनवैभवाने समृद्ध असलेल्या हिरव्यागार रम्य परिसरात अंमलनाला धरणाची निर्मिती १९८५ मध्ये झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पात २२.७० दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. जलाशयाचा उपयुक्त पाणीसाठा २१.२० दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पाची लांबी १६०८ मीटर, रूंदी ५५० मीटर, उंची २६.५७ मीटर आहे. जलाशयाची उपयोगिता लक्षात घेता या जलाशयाच्या सांडव्याची उंची एक मीटर वाढविण्याचे काम तीन वर्षापूर्वी झाले. या कामावर शासनाने दोन कोटी रुपये खर्च केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात शेती व्यवसाय सुजलाम सुफलाम करण्याच्या उदात्त हेतूने या प्रकल्पाची निर्मिती झाली. मात्र येथील औद्योगिक कारखाने, सिमेंट उद्योग आडवे आले. याच धरणातून गडचांदूर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित होणार असून या योजनेचे काम सुरू आहे. अंमलनाला जलाशय पूर्ण भरल्यानंतर सांडवा व प्रपातावरून वाहत असणाऱ्या पाण्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अंमलनाला धरण एक सुंदर पर्यटनस्थळ बनू शकते. बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल. शासनाने या तलावाकडे केवल सिंचनची एक सोय या दृष्टीने न पाहता पर्यटनस्थळच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. शासनाने रिसोर्टच्या माध्यमातून बोटींग, बगिचा, रेस्टारंट केल्यास पर्यटकांना फायदेशीर ठरेल. (वार्ताहर)