शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दांडियाच्या माध्यमातून नगर परिषदेने दिला स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: October 15, 2016 00:54 IST

नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दांडिया उत्सव...

महिला व बालकल्याण समितीचे आयोजन : आठ संघांनी घेतला भागभद्रावती : नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दांडिया उत्सव व स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. या स्पर्धेचे आयोजन सेवादल मैदान येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमस्थळी स्वच्छतेचा संदेश देणारे विविध फलक लावण्यात आले होते. तसेच शौचालयाचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात आले होते. दांडिया खेळणारे स्पर्धकसुद्धा स्वच्छता फलकाद्वारे संदेश देत होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, डॉ. माधवी मिलमिले, महिला व बालकल्याण सभापती शारदा ठवसे, आरोग्य सभापती मीनल आत्राम, नगरसेविका रेखा खुटेमाटे, आशा निंबाळकर, बांधकाम सभापती प्रमोद गेडाम, प्रा. संजय आसेकर, विनोद वानखेडे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, सुधीर सातपुते आदी उपस्थित होते.प्रथम बक्षीस १५ हजार रुपये रोख व शिल्ड के.डी. ग्रुप गडचांदूर, द्वितीय १० हजार रोख व शिल्ड जे.एम.डी. ग्रुप गडचांदूर व तृतीय बक्षीस प्रिया ग्रुप पाच हजार रोख व शिल्ड आदींनी प्राप्त केले. वैयक्तिक उत्कृष्ट वेशभूषेचे बक्षीस भद्रावतीची स्नेहल कोलते तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस घोडपेठ येथील द्रुप वऱ्हाडे याला मिळाले. स्थानिक प्रशिक्षण घेणाऱ्यामध्य ेपहिले बक्षीस खुशी मरस्कोल्हे व दिव्या सिडाम, द्वितीय करिष्मा आत्राम व खुशी सिडाम तर तृतीय गायत्री ठाकरे व तन्वी कापसे यांना मिळाले. परीक्षक म्हणून नाफीस अहमद व आरती उपाध्याय आणि प्रशिक्षक म्हणून स्वप्निल डांगे यांनी काम पाहिले.या खेळाडूंना वेशभूषेचा खर्च येतो. त्यामुळे पुढील वर्षी बक्षीसांची रक्कम व संख्या वाढविण्याची सूचना आ. बाळू धानोरकर यांनी केली. तर नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले की, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरपरिषदेद्वारे सातत्याने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. १७ आॅक्टोबरला मागेल त्याला शौचालयाबाबत मेळावा घेण्यात येणार आहे. याप्रसंगी त्यांनी स्वच्छता तथा शौचालयाची माहिती दिली. नागरिकाननी प्लास्टिक वापरू नये. शौचालयाचा वापर करावा. कचरा घंटागाडीतच टाकावा, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)