शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला

By admin | Updated: May 22, 2015 01:25 IST

यंदा अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी निगिडत व्यवसायांवरही पडला आहे.

चंद्रपूर : यंदा अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी निगिडत व्यवसायांवरही पडला आहे. शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारिपटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे अधोेगतीच्या मार्गावर आहेत. शेती निगिडत अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो. गावोगाव भ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुऱ्हाडी, वखर व डवऱ्याची पास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरु स्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की दुसऱ्या गावांत अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. भंडारा तालुक्यात या समाजाची ५-१० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून भंडारा येथील घटक बनली आहेत. परिसरातल्या शेतकऱ्यांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्त्या करून ही कुटुंबे आपला उदरिनर्वाह चालवितात. परंतु यावर्षी शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतीच्या अवजाराची कामे बंद आहेत. पेरणीच्या काळात फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरी करतील, असे निराशाजनक मत त्यांनी व्यक्त केले. बैलगाड्यांची लाकडी चाकेही आता इतिहास जमा होवून त्यांची जागा लोखंडी चाकांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)