शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

By admin | Updated: October 19, 2015 01:30 IST

आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला.

सुधीर मुनगंटीवार : मार्गदर्शन कार्यशाळेत केले आवाहन चंद्र्रपूर : आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला. आदर्श ग्राम गाव योजनेंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेली २७ गावे पहिल्या टप्प्यात आदर्श करण्याचा आपण सर्वशक्तिनिशी प्रयत्न करू. जलयुक्त शिवार योजना, मनरेगा यासारखी कामे मोठया प्रमाणात लोकसहभागातून केली जाऊ शकतात. प्रत्येक कामासाठी निधी आवश्यकच आहे असे नाही. संस्कार व इतर कामे हे निधीशिवाय गावात होऊ शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंत:करणापासून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या आदर्श ग्राम मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, हरीश शर्मा, भास्कर थेरे पाटील, यशदाचे संचालक सुमेध गुर्जर, साधनव्यक्ती रामलाल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अल्का लोणकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहिते आदींची प्रामुख्?याने उपस्थित होते.कार्यशाळेत बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २७ गावांशी संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पेयजल तसेच शेतीसाठी पाणी या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी गावागावांत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाचा भौतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तसेच मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातूनच आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यातील २७ गावे हे राज्यातील इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरावी, यादृष्टीने आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)