शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maharashtra Election 2019 ; कमी मतदान झालेल्या क्षेत्राची वाढविणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM

२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमागे वळून पाहताना : सहा विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात चंद्रपूर पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक इतिहासात चंद्रपूर क्षेत्रात २०१४ पर्यंत सर्वाधिक कमी मतदान झाले होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जागृतीपर विविध उपक्रम सुरू करण्यात आले.२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ चिमूर मतदार संघ ७४.५५ टक्के, राजुरा ७०.८३ टक्के, वरोरा ६४.८१ टक्के, बल्लारपूर ६३.१८ तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदार संघ ५४.०७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. एक लाख १३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारांच्या वाढीत २२ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये नऊ लाख ६० हजार ७२७ पुरुष तर नऊ लाख १८ हजार ९३८ महिला मतदारांचा समावेश आहे. २०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण ६६.५० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदार संघात ६९.६१ टक्के, बल्लारपूर ६४.१६ टक्के, वरोरा ६३.३५ टक्के, चंद्रपूर ५३.१० टक्के, चिमूर ७३.५२ टक्के, ब्रह्मपुरी ७५.२७ टक्के मतदान झाले होते. आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदार संघाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले. जागृतीपर विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता गावागावांत संबंधीत यंत्रणा कार्य करीत आहे.महाविद्यालयांवर लक्ष केंद्रीतचंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यापूर्वी विशेष प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्याच्या पाच विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत कमी मतदान झाले. खरे तर या क्षेत्रात चंद्रपूर शहराशी संबंधीत असणारी शेकडो गावे आहेत. शहरातील नवीन विचारांचा परिणाम युवक-युवतींवर होणे अपेक्षित होते. मात्र, उलट प्रकार दिसून आला. यंदा हे चित्र बदलू शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर