शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मतदारराजाचा महाकौल मशीनबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:01 IST

सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोबरला संबंधित एसडीओ कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्दे७१ उमेदवारांचा २४ ऑक्टोबरला फैसला : जिल्ह्यात ६२.४० टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा या सहा विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण ६२.४० टक्के टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोबरला संबंधित एसडीओ कार्यालयात मतमोजणी होणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७६ हजार ३५१ मतदार आहेत. त्यामध्ये नऊ लाख ६२ हजार ३७८ पुरुष मतदार तर नऊ लाख १३ हजार ९५१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात २२ तृतीयपंथी मतदार आहेत.सहाही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. रविवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी सकाळीदेखील ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सकाळच्या सुमारास फारसे नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत सहाही विधानसभा क्षेत्रात सरासरी केवळ ६.३७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंतही अशीच परिस्थिती होती. दोन-चार नागरिक केंद्रावर येत राहिले. ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १६.७९ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडू लागले. दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.५६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत ४२.३१ टक्के तर सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५५.८४ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६२.४० टक्के मतदान झाले.सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, अनेक केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी आल्या. मूल तालुक्यातील मौजा मरेगाव येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान सकाळी ८:१० वाजता सुरू झाले. नागभीड येथील मतदान केंद्र क्रमांक १३१ वर १४० मतदानानंतर मशीनमध्ये बिघाड झाला. मात्र लगेच नवीन मशीन लावण्यात आली. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा - जूनगाव येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ४५ मिनिटे मतदान बंद पडले होते. घुग्घूस येथील कॉलरी शाळा मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत मतदान पार पडले. मात्र त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. ४० मिनिटापर्यंत मतदान थांबले होते. त्यानंतर नवीन व्हीव्हीपॅट लावण्यात आले. चिमूर विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ३० ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आला होता.चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रियासोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्हा प्रशासनातील दहा हजार ६६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस प्रशासनातील चार हजार ४६६ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेकरिता तैनात केले आहे. यामध्ये १९५ पोलीस अधिकारी, दोन हजार ३८० पोलीस कर्मचारी, सात अर्धसैनिक दल, एक हजार २०० होमगार्ड, सी ६० दंगा नियंत्रण पथक दोन, एक बॉम्बशोधक पथक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर व वरोरा मतदार संघातील ७९ संवेदनशील मतदार केंद्राच्या परिसरात पोलीस पथकाने विशेष लक्ष ठेवले होते. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात अनोळखी व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांनी अशा केंद्रांवर वॉच ठेवण्यात आला होता.लोकसभेत बहिष्कार विधानसभेत मतदानचिमूर विधानसभा मतदार संघातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज व चिखलगावच्या नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा इतर गावांसोबत संपर्क तुटतो. गावकरी मुलाच्या मागणीसाठी आग्रही होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत दोन्ही गावातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर