शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

दलितवस्तीत उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:33 AM

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : महावितरणने फुलविले १३२४ चेहऱ्यांवर हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकूूण १३२४ चेहºयांवर हास्य फुलविण्यात महावितरणचे चंद्रपूर परिमंडळ यशस्वी ठरले आहे.या अभियानांतर्गत चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील येल्लापूर येथे १३८, गुडसेल्ला येथे ११० व कुंभेझरी येथे १६६, चिमूर तालुक्यातील वडसी येथे ५२, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे १७, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे ३४ व गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे ७ घरात वीज जोडणी करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे ७०, अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे १११, महागाव येथे ८३, चेरपल्ली येथे ६२, गोंिवंदगाव येथे ६०, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा येथे १७१, जाफराबाद येथे १३९ व गुमलकोंडा येथे १०४ गावात वीज जोडण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ८०० व चंद्रपूर जिल्ह्यातील ५२४ अशा एकूण १३२४ गरीब घरात प्रकाशाची किरणे पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.राज्यभरातील १०२ गावात हे अभियान राबविण्यात येत असून यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येत आहे. उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वीजजोडणी व एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले.उद्दिष्ट करणार पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हसके यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभाग व उपविभाग वीज जोडणी देण्याचे दायित्व पार पाडत आहे. दरम्यान, शासनाने दिलेले उद्दिष्ट महावितरणच्या वतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज