शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यात साथीचे थैमान

By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST

सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक

लखमापूर : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या वातावरणात उष्णतेची लाट आहे. परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस कोसळतो. थोड्याच वेळात लख्ख सूर्यप्रकाश पडून उष्णतेत वाढ होते. ऊन्ह-पावसाचा खेळ सुरू असताना वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विस्कळीत झालेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. अस्वच्छ वातावरण व दूषित पाण्यामुळे तापाच्या साथीत भर पडत आहे.सर्दी, खोकला, अंग दुखणे यासह रुग्णांना प्रथम ताप येतो. औषधे घेऊनही हा ताप कमी होत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचार करूनही ताप कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच तालुक्यातील आवाळपूर येथील दीपक बापुराव उराडे याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच आंबेडकर वॉर्डातील सात ते आठ रुग्ण चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची भीती पुन्हा वाढली आहे. त्याच्या दीपकच्या मृत्यूपूर्वी त्याला तीन-चार दिवस ताप आल्याची माहिती आहे. तापाने तालुक्यात थैमान घातले असताना शासकीय आरोग्य यंत्रणा कुंंभकर्णी झोपेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात जाऊन रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारची जागृती करताना दिसत नाही. परिचारिका गावात जात नाही. खेड्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर नियमित टाकले जात नाही. स्वच्छतेबद्दल ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. त्यातच सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कर्मचारी बिधनास्त वावरत आहेत.सध्या तापाचा जोर एवढा आहे की रुग्ण आजारी पडला, की तो एका दिवसातच मृत्युमुखी पडतो. आवाळपूर येथील दीपक बाबुराव उराडेसह येथील अनेक रुग्ण आजारी पडल्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालजात भरती करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाने एक दिवस उपचार केल्यावर या सर्वांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविले. मात्र त्यांपैकी दीपकचा मृत्यू झाला. पावसाळा संपत आला तरी जंतू नाशक पावडरची फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात डासांचा प्रकोप आहे. त्यातून साथीचे आजार उद्भवत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातकील ग्रामीण भागात जंतू नाशक पावडरची फरवारणी करण्याची मागणी केली जात आहे. पूर्वी पावसाळ्यात अशा प्रकारच्या फवारण्या जिल्हा परिषदेमार्फत होत होत्या. मात्र गेल्या काही वर्षात या फवारण्या बंद झाल्या आहे. त्यामुळे अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवत आहेत. (वार्ताहर)