शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्रमुल्यांकनात कोटगाववर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

फोटो नागभीड : तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या जिल्ह्यातील संपूर्ण ...

फोटो

नागभीड : तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या जिल्ह्यातील संपूर्ण गावांच्या तुलनेत कोटगाव हे गाव तसूभर पुढेच होते. मात्र केवळ राजकीय दबावापोटी दुसºयाच गावास पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली. हा कोटगाव या गावावर अन्याय असून पुन्हा मुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी गावकºयांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पुनर्रमुल्यांकन न झाल्यास जि.प.समोर उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

१९५६ मध्येच आदर्श गावाची पताका फडकावणाºया कोटगावने गेल्या काही वर्षात शासनाच्या आदर्श ग्राम योजनेत अनेकदा सहभाग घेतला. नुसता भागच घेतला नाही तर या गावाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. लोक सहभागाच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावात कोणताही सामुदायिक कार्यक्रम असो या गावाने कधीच पाय मागे घेतले नाही.

यावर्षीही कोटगावने जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला आणि या गावात वेगळाच हुरूप निर्माण झाला. स्मार्ट ग्रामच्या ज्या काही अटी नियम आहेत, त्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी या गावाने कंबर कसली आणि गावात लोकसहभागाने कोटगाववासीयांनी अनेक कामे पूर्ण केली. एवढेच नाही तर आदर्श स्मार्ट ग्राम योजनेत अंतर्भूत शासकीय कागदपत्रांची पूर्तता, शासकीय नियमानुसार गावातील कामेही केली.

बॉक्स

अधिकाºयांनी येऊन गावाची तपासणीही केली

मुल्यांकनासाठी आलेले अधिकारी गावात आले. गावाची तपासणी केली.पण योजनांची माहिती असलेले बुकलेट घेऊन गेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करा आपले गुण नक्कीच वाढतील, असा सल्ला मात्र या अधिकाºयांनी दिला. या स्मार्ट ग्राम स्पर्धेचा निकाल आला, तेव्हा गावकºयांना चांगलाच धक्का बसला. कारण निवडीत कोटगावला वगळण्यात आले होते. या अन्यायाविरोधात गावकºयांनी लढा देण्याचा निर्णय घेतला असून प्रथमत: गावकºयांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून पुनर्रमुल्यांकनाची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने गावकºयांनी आता विभागीय आयुक्तांना पुनर्रमुल्यांकनासाठी साकडे घातले आहेत.