शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

तातडीने पंचनामे करा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM

यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीसह विविध पिके संकटात सापडले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सतेच्या खुर्चीसाठी दंग आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक आडवे पडून नष्ट होत आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाºया शेतकऱ्यांना अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे.धान, सोयाबीन, कापूस, ज्वारीसह अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. मात्र, सरकारच्या वतीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता वाऱ्यावर सोडत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिके नष्ट होत असल्याने तातडीने पंचनामे करणे आवश्यक होते. प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवाळीनिमित्त सुट्टीवर असल्याने पंचनामे कोण करणार, असा प्रश्नही आमदार वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार