शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मोफत अन्न-धान्य वाटपाला सावली व सिंदेवाहीतून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.

ठळक मुद्देगोरगरिबांना दिलासा : गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आला.निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजवतांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या शुभारंभाप्रसंगी सावली येथे नगराध्यक्ष नगरपंचायत विलास यासलवर, सभापती पंचायत समिती विजय कोरेवर, तहसीलदार पी.के.कुमरे, सरपंच राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, मुख्याधिकारी मंजुषा वाजळे तसेच सिंदेवाही येथे नगराध्यक्ष नगरपंचायत आशाताई गंडाते, सदस्य जिल्हा परिषद रमाकांत लोंढे, स्वप्नील कावळे, नरेंद्र भैसरे, अरुण कोलते, सिमताई साखरे, राहुल पोरेड्डीवार, विरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. तर यावेळी दिव्या संघपाल दुधे, मालू बंडू मेदपल्लीवार, मिनाक्षी राऊत, शालू मेदपल्लीवार यांच्यासह ३० तर सिंदेवाही येथे जयप्रकाश बबन शेंडे, रोशनी चारसिंग ताक, शिफा स्लिम, सुरेश पस्तंवार यांच्यासह ३० लाभार्थ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांना खºया अर्थाने आधार देण्याचे काम पालकमंत्रीविजय वडेट्टीवार करीत आहेत.प्रति कुटूंब दहा किलो तांदूळकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली, कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकूणच हातावर पोट असणाºया आणि गोर-गरीब जनतेवर याचा पर्यार्याने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे, त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत ब्रम्हपुरीनंतर आज सावली आणि सिंदेवाहीत प्रति कुटूंब १० किलो तांदूळ,दोन किलो तूर डाळ, एक किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, एक किलो मीठ, एक साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम १४४ चे पालन करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस