शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच ३० हेक्टरवरून ७५० हेक्टरपर्यंत पोहोचला करडीचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST

चंद्रपूर : धान व कपाशीचे कोठार म्हणून ओळखणाऱ्या १५ तालुक्यांतील शेतकरी आता काळाच्या बदलत्या मागणीनुसार गळीत धान्यांकडेही लक्ष देऊ ...

चंद्रपूर : धान व कपाशीचे कोठार म्हणून ओळखणाऱ्या १५ तालुक्यांतील शेतकरी आता काळाच्या बदलत्या मागणीनुसार गळीत धान्यांकडेही लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे २०१८-१९ च्या रब्बी हंगामात केवळ ३० हेक्टरमध्ये मर्यादित राहिलेला करडीचा पेरा २०२०-२१ च्या हंगामात प्रथमच तब्बल ७५० हेक्टरपर्यंत पोहाेचला. जवस लागवड क्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत १०० हेक्टर, तर सोयाबीन ८ हजार हेक्टर क्षेत्रात वाढली आहे. जिल्ह्यात धान व कापूस उत्पादकांचीच संख्या सर्वाधिक आहे. यातही काही शेतकरी पारंपरिक शेती टाळून नवनवीन बदलांचा स्वीकार करीत आहेत. अल्पभूधारकांची स्थिती मात्र वाईट आहे. राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, कोरपना तालुक्यांत कपाशीवर, तर नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली तालुक्यांत भात शेतीवर नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळणारा हमीभाव हाच मोठा आधार ठरत आला; पण शेतीसमोरील संकटे दिसत असल्याने कापूस व भात शेतीसोबतच गळीत तेल पिकांचाही पर्याय स्वीकारत आहेत. मागील दहा वर्षांच्या इतिहासात रब्बी हंगामात करडीचे क्षेत्र कधीच ५० हेक्टर क्षेत्राच्या पलीकडे जाऊ शकले नाही. परंतु, यंदा करडीचे क्षेत्र ७५० हेक्टरवर पाेहोचले. मागील रब्बी हंगामात इतर गळीत म्हणून ३०० हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. यंदादेखील या क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी ६५० हेक्टर क्षेत्रात जवस लागवड झाली. यामध्ये वाढ होऊन ७५० हेक्टर झाले आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेतकरी आपल्या शेतीत आमूलाग्र बदल करण्याची संधी वाया जाऊ देत नाही, हेच यंदाच्या करडी पिकावरून दिसून येते.

सूर्यफूल लागवड हद्दपारीच्या मार्गावर

यंदाच्या रब्बी हंगामात गळीत धान्य गटातील सोयाबीन क्षेत्र कमालीचे वाढले. विशेषत: राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी व चंद्रपूर तालुक्यांत सोयाबीन लागवडीत मोठी वाढ झाली. तुलनेने मोहरी व सूर्यफूल लागवडीचा प्राधान्यक्रम बदलविल्याचे दिसून येते. त्यामुळे कृषी विभागाने यासंदर्भातील कारणांचा अभ्यास करून पुढील हंगामात अधिकाऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन् करावे लागणार आहे. कारण, हंगाम व ऋतुमानानुसार पीक पद्धती बदलली नाही तर उत्पादन घटून एकूणच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

कोट

जमिनीचा पोत लक्षात घेऊनच विविध पिकांचा विचार करावा लागतो. सिंचनाची सुविधा, दर्जेदार बियाणे, पेरणीपूर्व हंगाम, आदी बाबी तेलबियांच्या उत्पादनासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे शासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच याबाबतचे नियोजन करावे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजना पोहोचविल्या तरच शेती फायदेशीर होईल.

- सीताराम चौधरी, शेतकरी राजुरा

खरीप हंगाम झाल्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती रुळावर येईलच याची खात्री नाही. शेतकरी उत्पादन करतो; मात्र शेतमालाचे भाव ठरवू शकत नाही, ही त्याची खरी अडचण आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा योजनांतून मिळवून दिल्यास मोठा आधार होईल. कारण शेतकरी स्वत:सोबतच इतरांसाठीही धान्य पिकवितो, हे लक्षात ठेवले पाहिजे.

- श्रीधर लोणकर, शेतकरी भद्रावती