शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आवडता रोवणी महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव ...

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव म्हणजे धानाची रोवणी. यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी या उत्सवाला सुरूवात केली आहे. या उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले असून हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. आणि या पिकावरच शेतकऱ्यांची वार्षिक गणिते अवलंबून असतात. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुलामुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे.

तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६६०.४५ हेक्टर आहे. यातील वाहितीखालील क्षेत्र ३१ हजार २०५.४९ हेक्टर असून यापैकी जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पऱ्हे टाकावे लागतात. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर पऱ्हे टाकण्यास सुरूवात होते. जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. मात्र यावर्षी योग्य पाऊस पडल्याने पऱ्हे यापूर्वीच टाकून झाले व वाढही योग्यप्रकारे झाली. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षी पऱ्ह्यांचा हंगाम योग्य व वेळीच झाला आणि पाऊसही आवश्यकतेनुसार पडत असल्याने रोवणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.

बॉक्स

अशी आहे मजुरी

अगदी सकाळी ७ वाजेपासून हे शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून संध्याकाळी ६ वाजता मोकळे होतात. एरव्ही १०० ते १२५ रूपये असणारी एका स्त्रीची एका दिवसाची मजुरी २०० रूपयापर्यंत गेली आहे. पुरुषाला ३०० रूपये मिळत आहेत. महिला वर्गाकडून गट स्थापन करून दरएकरी पऱ्हे व रोवणी करण्याचे तीन हजार रूपये घेण्यात येत आहेत.

बॉक्स

शेतीतून चार महिने काम

शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी हे खरे नाही. मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.