शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या लेखणी बंदचा नागरिकांना फटका

By admin | Updated: October 13, 2016 02:24 IST

सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे

संघटना तटस्थ: अनेक योजनांचे साहित्य वाटप बंदगोंडपिपरी : सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वर्गाला याचा चांगलाच फटका बसत असून येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयाची दैनंदिन पायपीट करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ग्राम विकास मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने अनेकदा वरिष्ठांसोबत चर्चा केली. मात्र समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धरणे आंदोलनेही झालीत. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे दर्शविल्याने काही काळाकरिता कृषी संघटनेने आंदोलन मागेही घेतले. परंतु समस्या निकाली व काढल्याने अखेर ३ आॅक्टोबर २०१६ पासून कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढवून लेखणी बंद आंदोलन सुरु केले.बेमुदत सुरु असलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील दुर्बल घटक शासनाच्या जनकल्याणकारी योजनापासून वंचित राहत असून या आंदोलनामुळे साहित्य वाटप, नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आचार संहिता लागू होत असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचणे कठीण जाणार आहे. शासनाने संघटनासोबतचा तिढा सोडवून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)