लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशी ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाण्याच्या सुचना असतानाही रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. परिणामी वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांचा जीवही मेटाकुटीस आला आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच चारचाकी व दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु आहे. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्र्कींग झोन उपलब्ध नाहीत. तसेच रस्तेही अरुंद आहेत. त्यातच अनेकांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा रस्ते अरुंद झाले आहेत.येथील महात्मा गांधी मार्ग, मिलन चौक, जटपुरा गेट चौक, स्टेट बँक परिसर, गोकुल गल्ली, गंजवार्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर,गोल बाजार, बिनबा रोड, गांधी चौक या मुख्य ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी वाट्टेल तिथे वाहने पार्क केलेली आढळतात. त्यातच सायंकाळी सहा वाजता बाजारपेठ बंद होते. त्यामुळे मोठी कोंडी होत असते. बºयाच वेळ मार्ग मोकडा होण्याची वाट बघावी लागते.‘पे अॅण्ड पार्क‘ नावापुरतीचशहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी पार्र्कींग झोन निर्माण करून ‘पे अॅण्ड पार्क’ योजना सुरू केली. मनपा कार्यालयाजवळ, गांधी चौकातील पश्चिम दिशेला, जुन्या महात्मा गांधी शाळेजवळ, जुन्या राजे धर्मराव प्राथमिक शाळेजवळ आणि रघुवंशी कॉम्प्लेक्समधील बेसमेंट या ठिकाणी मनपाने पार्र्कींग झोन निर्माण करून पे अॅण्ड पार्क योजना सुरू केली आहे. हे शुल्क अधिक असल्याने हे पार्र्कींग झोन ओस पडल्याचे दिसत आहे.रस्त्याच्या रुंदीकरण कासवगतीनेमागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वाहतूक समस्येमुळे त्रस्त आहेत. चंद्रपुरातील महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर विविध प्रकारची दुकाने आहेत. पूर्वीच हे रस्ते अरुंद आहेत. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहेत. त्यामुळे पुन्हा रस्ते अरुंद झाले आहेत. या दोन्ही रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अतिशय मंदगतीने होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे.
लॉकडाऊनमध्येही चंद्रपुरात होत आहे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:00 AM
चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच चारचाकी व दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते.
ठळक मुद्देउपाययोजनेची गरज : रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळेही होतात जाम