शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाअभावी एम्टा कामगारांची उपासमार

By admin | Updated: May 22, 2015 01:21 IST

सुप्रिम कोर्टाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये देशातील २१८ कोल ब्लॉक रद्द करण्यात आले होते.

भद्रावती: सुप्रिम कोर्टाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये देशातील २१८ कोल ब्लॉक रद्द करण्यात आले होते. त्यात बरांज येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील चारही ब्लॉक रद्द करण्यात आले. परिणामी या खाणीत कामावर असलेल्या स्थायी व अस्थायी ७७५ कामगारांना एप्रिल महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. या कामगारांचा वसाहतीतील वीज पुरवठा खंडित केल्याने या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा नसल्याने मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात कामगारांचे कुटुंब वसाहतीत राहत आहे. त्यांना उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करीत दिवस काढावे लागत आहे. दिवसभर घरात उकाड्यात राहायचे आणि रात्रीच्यावेळी घराबाहेर मोेकळ्या जागेवर झोपायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.आंघोळ व पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्यासाठी कामगारांच्या कुटुंबाला भटकंती करावी लागत आहे. लहान मुलांचे तर प्रचंड हाल होत आहेत. या खाणीची एजन्सी एम्टाकडून गेली असली तरी खाणीचा ब्लॉक कर्नाटक सरकारला पुन्हा भेटल्याने या प्रशासनाने मात्र कामगाराकडे दुर्लक्ष केले आहे.बरांज येथे कर्नाटक पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने कोळसा उत्खनाचे काम २००८ मध्ये कर्नाटका एम्टा या एजन्सीला दिले होते. मात्र ही कंपनी सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या कंपनीने शासनाच्या निर्णयानुसार कोणतीही रितसर परवानगी न घेता खाण सुरू केली. ते करताना बरांज गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. याविरुद्ध आंदोलन करुन राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी शेकून घेतलीय मात्र अजुनही येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही.कर्नाटका एम्टाच्या या बेलगाम कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने खाणीतील एक ते चार असे सर्व ब्लॉक रद्द केले. एम्टा कंपनीला ३१ मार्च २०१५ पासून खाणीचे काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. एम्टा कंपनीचे काम बंद झाल्यानंतर पुन्हा बरांज येथील चार ब्लॉक कर्नाटक सरकारला पुन्हा मिळाले. मात्र अजुनही कर्नाटक सरकारकडून कोळशाचे उत्खनन करण्यात आले नसून प्रशासनसुद्धा नेमण्यात आले नाही. या खाणीत काम मिळेल अशी आशा असल्याने कामगार मात्र वसाहत सोडून गेले नाही. एम्टा कंपनीने कामगारांना एप्रिल महिन्यापासून वेतन देणे बंद केले. वसाहतील विद्युत पुरवठा खंडीत केला. एम्टा एजन्सीच्या माध्यमातून एम्टा खाणीत हे कामगार काम करीत होते. मात्र आता कर्नाटक सरकारसुद्धा या कामगारांकडे लक्ष देत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)