शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

अकरापैकी आठ सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:36 AM

मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे नदी, नाले, तलावही भरले : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढील सिंचनाचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकºयांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकºयांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. अशातच जुलैच्या अखेर तीन दिवसांपासून आतापर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. आठ सिंचन प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत.सिंचन प्रकल्पातील जलसाठाचंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर या आठ प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प सद्यस्थितीत ओव्हरफ्लो झाले आहेत. तर अमलनाला प्रकल्पात ८४.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ७८.४७ टक्के, लालनाला प्रकल्पात ८८.७१ टक्के जलसाठा आहे. असा पाऊस पडत राहिला तर हे प्रकल्पही ओव्हरफ्लो होतील.मामा तलावही तुडुंबचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. हे सर्व तलाव आता शंभर टक्क़े भरले आहेत.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरण