शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेप्रवास नको रे बाबा, दररोज ५० ते ७५ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर ...

चंद्रपूर : मागील महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वेस्थानकांवरून पूर्वी चिक्कार प्रवासी प्रवास करायचे. मात्र आता बोटावर मोजण्याइतके प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दहशतीने दररोज ५० ते ७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

बल्लारपूर रेल्वे जंक्शनमधून जीटी एक्स्प्रेस, दक्षिण, सिंकदराबाद, दानापूर, तेलंगणा, गौरखपूर अशा साधारणत: ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. या ट्रेनने पूर्वी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजलेला दिसून यायचा. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे काहीकाळ रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही अटी व शर्तीवर रेल्वेचा प्रवास सुरू करण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आपसुकच प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातही अनेकजण प्रवास टाळत असून दररोज ७५ ते १०० च्या जवळपास तिकिटे रद्द होत असल्याची माहिती आहे.

बॉक्स

मुंबईसाठीची ट्रेन रद्द

बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन धावत होती. त्यामुळे मुंबईला ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र मागील वर्षींपासून ही ट्रेनच बंद आहे.

-आंध्रामध्ये रेल्वेचे काम सुरू असल्याने बहुतांश ट्रेनचा मार्ग वळविण्यात आला आहे. दिल्ली ते चेन्नईच्या ट्रेन बल्लारपूर जंक्शनवरून जाण्याऐवजी माजरीवरून जात असल्याची माहिती आहे.

बॉक्स

कोरोनामुळे प्रवाशाची संख्या ओसरली आहे. दररोज साधारणत: ५०च्या जवळपास तिकिटे रद्द होत आहेत. सद्यस्थितीत रेल्वेच्या ३० फेऱ्या होत आहेत. मात्र त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी नाही.

-ओमप्रकाश कुमार, टीटीआय, बल्लारपूर

-----

प्रवाशांअभावी अनेकदा ट्रेन रद्द

सद्यस्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. परंतु, प्रवासी कमी असल्याने बऱ्याचंदा ट्रेन रद्द होत आहेत. मात्र याबाबत प्रवाशांना सूचना नसल्याने त्याची मोठी फजिती होत आहे.