शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

वितरण व्यवस्थेत आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 6:00 AM

राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ग्राहकांच्या मूलभूत हक्काचे होणार सवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्राहकाला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मूलभूत अधिकार आणि हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती करीत आहे. ग्राहकाने आपल्या मुलभुत हक्काप्रति नेहमी जागरुक राहावे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य गिरीधरसिंह बैस, वामनराव नामपल्लीवार, सदाशिव सुकारे तथा धान्य सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य उपस्थित होते.शासकीय कार्यालयीन अधिकारी नागरिकांना, अभ्यांगताना भेटत नाहीत. प्रश्न गांभीर्याने समजून घेत नाहीत. मराठी भाषेचा वापर होत नसून संवादात इंग्रजी शब्दाचा उच्चार करण्यात येऊ नये. अभ्यांगताकरिता राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सूचना फलकावर ठळक पणे प्रदर्शित करावे, अशा मागणी यावेळी केली.तक्रार केल्यास ७२ तासांत कार्यवाहीराज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी. ही तक्रार नोंदविल्यानंतर ७२ तासांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केल्या जात असल्याचे सांगून ते म्हणाले की चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास रोखले असता ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार त्यांनी यावेळी केले.जनतेच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवावा१८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय अन्वये शासकीय कार्यालयात जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३० ते ३.३० ही वेळ राखून ठेवावी व उपविभाग स्तरावर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ कालावधी, तालुका स्तरावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते ५ हा कालावधी अभ्यांगतासाठी राखून ठेवावा, असे ठरले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. याशिवाय अभ्यांगतासाठी राखून ठेवालेल्या कालावधीत अधिकाऱ्यांनी शक्यतो दौरा, बैठक आयोजित करु नये, अशी मागणीही सदस्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी