शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल तिथे फलक लावले जात आहे. या फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र यासाठी महापालिका प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.

शहरात फलक लावण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन काही शुल्क अदा करावे लागते. मात्र काही मोजक्याच जाहिरातदारांनी फलक लावण्याची परवानगी घेतली आहे. फुकटे जाहिरातदार महापालिका प्रशासन तसेच सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. शहरातील वीज खांब, चौकातील सिग्नल एवढेच नाही तर वृक्षांनाही या फलकबाजांनी सोडले नाही. नागरिकांचे लक्ष जाईल, अशी जागा शोधून फलक लावल्या जात आहे. यामुळे लक्ष विचलित होऊन वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहराचे सौंदर्यही यामुळे विद्रूप झाले आहे. मात्र महापालिका प्रशासनातील संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्यावेळी जाग आली तरच महापालिका प्रशासन अवैध फलक काढण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.

बाॅक्स

प्रशासनाचे दुर्लक्ष

शहर विद्रपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश आहे. मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. एवढेच नाही तर महापालिकेतील काही पदाधिकारी तसेच नगरसेवकही शहरातील विविध भागात विविध फलक लावून शहर विद्रुपीकरणासाठी हातभार लावत आहे.

वाहतूक सिग्नल, वीज खांबालाही फलक लावल्या जात आहे. रस्त्याच्या कडेला असल्या झाडांवरही फलक असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, हमाविद्यालय फलक लावण्यात अग्रेसर असून काही व्यावसायिक वाट्टेत तिथे फलक लावून मोकळे होत आहे. कारवाई होत नसल्याने स‌र्वांचेच फावत आहे.

--

होर्डिंगमधून पालिकेची कमाई

महापालिकेने शहरातील विविध जागा होर्डिंगसाठी निश्चित केल्या आहेत. यातून मनपाला मोठ्या प्रमाणत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, काही खासगी व्यक्तींनी फलकाची परवानगी घेतली असून ते महापालिकेकडे यासंदर्भातल करसुद्धा भरतात. महापालिकेने निश्चित केलेल्या काही फलकांद्वारे जनजागृतीसंदर्भात माहिती दिली जात असून अनेकवेळा ते खासगी व्यक्तींनाही दिल्या जात असून याद्वारे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

बाॅक्स

शहरातील जनता काॅलेज, बापट नगर, गांधी चौक, वरोरा नाका चौका, जटपुरा गेट परिसर, बाबूपेठ, बंगाली कॅम्प चौक या व्यतिरिक्त विविध रस्त्यांच्या कडेला तसेच वीज खांब, सिग्नलवरही मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता आहे.

कोट

शहर विद्रुपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे महापालिकेला कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अवैध ठिकाणी लावलेले जाहिरात फलक काढण्याची हिंमत महापालिका दाखवित नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.

-संजय वैद्य

माजी नगरसेवक, चंद्रपूर