शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाचे उडाले धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता ...

प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण : गावागावात जनजागृतीची गरज

सावली : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

गेली दोन वर्षे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात शंभर टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावागावात जनजागृतीही करण्यात आली. जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हागणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

शासनाने अनेकवेळा ‘स्वच्छतेकडून सुरक्षिततेकडे’ असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. पण जी गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त झालेली आहेत, त्या गावातील परिस्थिती विदारक असून ‘हीच का ती स्वच्छ व हागणदारीमुक्त गावे?’ असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गावात शौचालय निर्माण झाले खरे, पण त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत नसून नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसते.

बॉक्स

अनेक गावात नावापुरतेच अभियान

अनेक गावांमध्ये केवळ नावापुरतेच अभियान राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावात प्रवेश करताक्षणीच अस्वच्छता पहावयास मिळत असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.