शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दुधाची मागणी वाढली

By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST

दिवाळी म्हटली की फटाक्यांच्या आतषबाजीसोबत मिठाईचीही धूम असते. एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची पध्दत आहे. मिष्ठान्न बनविणाऱ्या व्यावसायिकांना दुधाची जास्त प्रमाणात आवश्यकता असते.

चंद्रपूर : दिवाळी म्हटली की फटाक्यांच्या आतषबाजीसोबत मिठाईचीही धूम असते. एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची पध्दत आहे. मिष्ठान्न बनविणाऱ्या व्यावसायिकांना दुधाची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. त्यासाठी ग्रामीण भागातील दुधाची जास्त प्रमाणात मागणी केली जाते. त्यामुळे दूध विक्रेत्यांना सध्या सुगीचे दिवस आलेले दिसत आहे. दसरा हा सण झाल्यानंतर कोजागिरीला सुरूवात होत असते. अनेक समाज बांधवातर्फे कोजागिरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी कोजागिरी पोर्णिमेपासून कोजागिरी उत्सवाला सुरुवात झाली. कोजागिरी उत्सव दिवाळीपर्यंत साजरा करण्यात येतो. रात्रीच्या वेळी दूध आटवून कोजागिरी उत्सव साजरा करतात. त्यामुळे अशावेळी दुधाची अत्यंत आवश्यकता असते. त्यासाठी अगोदरच दूध विक्रेत्यांकडून दुधाची मागणी केली जाते तर काही ठिकाणी दुधामध्ये विक्रेत्याकडून पाण्याची व अन्य पदार्थाची भेसळ केली जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. आता दिवाळीचा सण जवळच आला असून त्यासाठी मिठाईची मोठी मागणी राहणार आहे. प्रत्यक्ष दूध उत्पादनापेक्षा पुरवठा जास्त असल्याने गेल्या काही वर्षात दूध व मिठाईमध्ये काही व्यापाऱ्यांकडून अधिक लाभासाठी भेसळ केली जात असल्याचे उघडकीस आले होते. दोन वर्षापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्यांवर कारवाई केली होती. तसेच अधूनमधून दूध संकलन केंद्र व दूध विक्रेत्यांवर कारवाई झाली होती. मात्र कडक कारवाई न झाल्याने भेसळयुक्त मिठाई व दूधविक्री पुन्हा सुरू झाल्याचा शहरात चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात मिठाई विक्रेते ग्राहकांची गर्दी पाहून त्या मिठाईमध्ये भेसळ करीत असतात. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीवाला धोका होण्याची शक्यता निर्माण होते. आता सर्वांच्या आवडीची दिवाळी तोंडावर आली आहे. दोन दिवसानंतर दिवाळीला प्रारंभ होत आहे.दिवाळीला फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. याशिवाय दिवाळीच्या दिवसात एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे आपसुकच मिठाईला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकापेक्षा एक सरस पेढे, बरफी, काजूकटली, लाडू, मोतिचूरचे लाडू, बालुशाही आदी अनेक प्रकारच्या मिठाईने बाजारपेठ सजली आहे. या मिठाई बनविण्याकरिता दुधाची गरजे भासते. त्यामुळे सध्या अशा व्यावसायिकांकडून दुधाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने भावही गगनाला भिडले आहे. (शहर प्रतिनिधी)