शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची रक्कम केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून ...

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून दिले जात आहेत. पण हा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी तो कर्ज खात्यात जमा करून कर्ज कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाच काय आमचा सन्मान असा प्रश्न पडला आहे.

अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या हेतूने केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षभरात तीन टप्प्यात दोन हजार प्रति टप्प्यानुसार सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणे सुरू केले. केवळ शेतीवर जास्त उदरनिर्वाह आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत कमी असली तरी उपयोगी ठरत आहे. यातून शेतकरी पिकांना वेळेवर खते देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. पण सन्मान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात, त्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे त्याच्याकडून बँक प्रशासन कर्ज कपात करते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याचा विचार शासन व बँकांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.