शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

By admin | Updated: October 18, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान व कापूस पीक धोक्यात आली आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तेव्हा शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न उभा झाला होता. काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर उभी पिके करपणार, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. हवालदिल झालेला शेतकरी पिके वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत रोवणीची कामे केली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कापूस व धान पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यात परिस्थीती बिकट असून पावसाअभावी शेतकरी चिंतातूर आहे. हस्त नक्षत्रात पाऊस पडणार, अशा आशेवर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. हस्त नक्षत्र लागून पंधरा दिवस लोटूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतातील उभे पीक करपायला लागले आहेत. काही शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्यासाठी साधन नाही, त्यांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे धान पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूसही धोक्यातचंद्रपूर : मारडा परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस सुरू आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला आहेत. शेतातील सोयाबीन व कापसाला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र मारडा परिसरात दिवसाचे भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचण येत आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागण्याची व कापसाला बोंडे लागण्याची अवस्था आहे.मागील पंधरा दिवसाअगोदर पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने खत दिले. परंतु तेव्हापासून पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)