शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरची दीक्षाभूमी झाली पावन

By admin | Updated: October 17, 2016 00:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

रामदास आठवले : ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळाचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेबांनी १६ आॅक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शामुळे चंद्रपूरची दीक्षाभूमी पावन झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीतर्फे ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना. आठवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, मनपा महापौर राखी कंचर्लावार, अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, ‘सिरि गौतम बुद्ध’ चित्रपटाचे अभिनेते गगन मलिक व अभिनेत्री अंशू मलिक, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान आदी उपस्थित होते. यावेळी ना. आठवले म्हणाले की, आम्ही क्रांतीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत शांतीच्या मार्गाकडे निघालो आहोत. बुद्धाचा शांतीचा मार्ग जगात शांतता निर्माण करू शकतो. बुद्धाच्या या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. आजचा दिवस बुद्धाच्या शांतीच्या मार्गाचे स्मरण करण्याचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बुद्धाचा मार्ग पुन्हा रूजविला आहे. या मार्गावरून आम्ही कधीही ढळणार नाही. चंद्रपूरच्या भूमीलादेखील बुद्धाच्या मार्गाचा लाभ झाला आहे. त्याचे अनुसरण सर्वांनी करावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. तत्पूर्वी प्रास्ताविक अशोक घोटेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामनराव मोडक, सदस्य कुणाल घोटेकर, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, प्रा. सतीश पेटकर, डॉ. डी.एस. रामटेके, डॉ. मिलिंद भगत आदींनी केले. कार्यक्रमाला अमेरिकेचे भदन्त होझान अलन सेनाडके, प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, नागपूरचे अध्यक्ष राजन वाघमारे, चंद्रपूरचे रिपाइं नेते राजू भगत, जयप्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाहुण्यांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शनदीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दीक्षाभूमीवर पाहुण्यांचे आगमन झाल्यावर ते थेट बुद्ध विहारात गेले. तेथे त्यांनी तथागत बुद्धाच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधी बुद्ध विहारात प्रवेश घेतला.मोदी असेपर्यंत चिंता नाहीयावेळी ना. आठवले यांनी बरीच फटकेबाजी केली. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे कामकाज आधी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे कुटुंबाकडे होते. आता ते घोटेकर कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार असेपर्यंत आपल्याला घाबरण्याचे काही कारण नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.