शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 6:00 AM

विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो.

ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : मिनघरी येथे ५६ शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : खरिप पिकांबरोबरच तालुक्यात रब्बी पिकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. जंगली प्राण्यांचा हैदोस भरपूर असल्याने पिकांची नासाडी होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करडई या काटेरी पिकांच्या बियाण्याची मागणी केली होती. ती लगेच मान्य झाल्याने मिनघरी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो. असे अनेक प्रयोग येथे झाले आहेत. धानाचे उत्पादन व संपूर्ण पीक घरी येईपर्यंत येणारा खर्च यात बरीच तफावत असल्याने काही शेतकरी आत्महत्येकडे वळतात. मात्र कृषी मित्र विलास गुरनुले यांनी स्वत:च्या शेतामध्ये विविध नवनवीन प्रयोग करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्यापासून वरिष्ठ कृषी क्षेत्रातील अधिकारी यांना मिनघरी गावाला भेट देण्यास प्रवृत्त केले, हे विशेष. अलिकडेच सर्वत्र मागणी असलेल्या ब्लॉक राईसची श्री पद्धतीने मंडल कृषी अधिकारी पि. के. मोतीकर आणि कृषीसेवक कोल्हापुरे यांच्या मार्गदश्रनात लागवड केली आणि ती यशस्वीही झाली.यासोबतच अलिकडे रब्बी पिकाच्या लागवडीला सुरूवात झाली असून परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य भरपूर असल्याने पिकाच्या नासाडीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र ते प्रमाण कमी करायचे असेल तर इतर पिकांच्या सभोवताल करडई या काटेरी पिकाची लागवड केल्यास जंगली प्राण्यांपासून इतर पिकांचे संरक्षण होऊ शकते. ही संकल्पना समोर आल्यानंतर समृद्ध शेतकरी उन्नत शेती रब्बी पीक प्रयोगशाळा मेळाव्यात कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी उदय पाटील यांच्याकडे करडई पिकाचे बियाणे उपलब्ध करण्याची मागणी केली. आणि काही दिवसातच ती मान्य झाल्याने मिनघरी येथील ५६ शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीसाठी तयारी केली आहे. यातून शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी तंत्रज्ञान पद्धतीने शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये बचत करता येऊन उत्पन्न वाढीस हातभार लागणार असल्याचे कृषी मित्र विलास गुरनुले लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती