शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यापाऱ्यांनी पाडले कापसाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार हजार ५०० रुपयांपासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदीड हजार रुपयांची घसरण : पांढºया सोन्याची अक्षरश: लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोनाचे संकट अचानक उभे राहिल्याने राज्यात शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे मागील महिन्यांपासून सर्वच कामकाज ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला कापूस घरीच ठेवावा लागला. मात्र शासनाने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शेतीकामांसह शेतमाल विक्री करायला परवानगी दिली आहे. परंतु राजुरा तालुक्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.शेतकरी नेहमीच या ना त्या कारणाने अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार हजार ५०० रुपयांपासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.खासगी व्यापारी एवढया मोठया प्रमाणात कापसाची अक्षरश: लूट करीत असल्याने कोणत्याही जबाबदार लोकप्रतनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केली नाही.शेतकºयांचा कुणी वाली उरला नसल्याने शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही. क्विंटलमागे दोन ते तीन हजारांच्या मोठया फरकाने कमी दर देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोने अक्षरश: लुटले जात आहे. कापूस पिकावर मोठया प्रमाणात खर्च असताना तीन हजारापर्यंत एवढया कमी दरात शेतकऱ्यांनी कापूस विकला तर यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची दुर्दैवी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.सीसीआय कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र राजुरा, कोरपना तालुक्यातील शासकीय कापूस संकलन केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सीसीआयची शासकीय कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सीसीआयची कापूस खरेदी तातडीने सुरू कराखासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत कापसाची अक्षरश: कमी दरात लूट करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्चही भरून निघत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून शासनाने तातडीने सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खासगी जिनींगवर कापसाला कमी दर देऊन खासगी व्यापारी कापसाची कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. -सुधाकर गेडेकर, शेतकरी,पाचगाव.

 

टॅग्स :cottonकापूस