शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM

दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.

ठळक मुद्देदिवसाला केवळ १० ते १२ डोनर : दररोज ४० ते ५० बाटलची रुग्णालयाला गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगभर कोरोनाने थैमान घातले असून शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय बंद केले आहे. तर व्यावसायिकांनाही आपले प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम रक्तदान शिबिर किंवा स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येवर झाला असून चंद्रपूर शासकीय रुग्णालयातत काही दिवसात रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे.दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.औद्योगिक जिल्हा असल्याने दररोज अपघात तसेच इतरही घटना सारख्या घडतात. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रुग्णालयामध्ये बाळंतपणे तसेच अत्यावश्यक रुग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे रक्तदात्यांच्या तुलनेमध्ये रक्ताची मागणी वाढत असल्यामुळे आणि सध्यास्थिती शासकीय रक्तपेढीमध्ये पाहिजे तेवढा रक्तसाठा नसल्यामुळे येत्या काही दिवसामध्येच रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.कोरोनामुळे रक्तदातेही धास्तावलेसध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशावेळी रक्तदातेही रक्तदान करण्यासाठी तयार नाही. सामान्य वेळी ३० ते ४० रक्तदाते स्वच्छेने रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी येत होते. आता मात्र ही संख्या घटली असून सरासरी केवळ १० ते १२ रक्तदातेच दररोज रक्तदान करण्यासाठी येत आहे.भीती बाळगू नका, रक्तदान कराउन्हाळ्याच्या दिवसामध्ये अपघात तसेच इतर आजारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. अशावेळी भरपूर प्रमाणात रक्तदात्यांची गरज असते. मात्र याच दिवसामध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते.त्यामुळे या दिवसामध्ये रक्तदान करणे गरजेचे आहे. यावेळी कोरोनामुळे भितीयुक्त वातावरण आहे. परिणामी रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. रक्तदात्यांनी भिक्ती बाळगू नका, रक्तदान करा, आपल्या रक्तदानामुळे दुसºयांचा जीव वाचू शकतो.- डॉ. प्रेमचंद, ब्लड बँक अधिकारी, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBlood Bankरक्तपेढी