शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीवरून चंद्रपूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

चंद्रपूर : सन २०२०-२०२१ या वर्षाची जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. या पैसेवारीत जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे ...

चंद्रपूर : सन २०२०-२०२१ या वर्षाची जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. या पैसेवारीत जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १७८८ गावातील पैसेवारी ४८ टक्के आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई जाहीर झाली नसल्याने मदतीची प्रतीक्षा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण गावांची संख्या १८३६ आहे. त्यापैकी खरीप गावांची संख्या १८३३ तर रबी गावांची संख्या ३ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पीक नसलेल्या गावांची संख्या ४५ आहे. जिल्ह्याची पीक परिस्थिती जाणून घेण्यासाठी पैसेवारीचा आधार घेतला जातो. ही पैसेवारी महसुलाची यंत्रणा जाहीर करते. त्यावरच शासनाचे धोरण ठरवले जाते. महसुलाच्या ठोकताळ्यानुसार ५० टक्क्यांच्या आतमध्ये पैसेवारी असेल, तर जिल्हा किंवा गाव दुष्काळग्रस्त समजण्यात येते.

३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यामध्ये बहुतांश तालुक्यातील पैसेवारी ही ५० पैशाहून कमी आहे. जिल्ह्यातील १७८८ गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आहे तर ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १५११ आहे. ५० पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४५ आहे. केवळ मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्याची पैसेवारी ५० आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

बॉक्स

यांना मिळतो लाभ

ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यांना शेतसाऱ्यामध्ये सुट मिळते. वीजबिलात ३० टक्के कपात, शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येते. कर्जवसुलीची सक्ती नसते. अशा सवलती दिल्या जातात.