शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:26 AM

गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रशांत खैरे : गडचांदूरमध्ये पार पडली शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गणेशोत्सव हा भारतीय संस्कृती जोपासणारा सण असून गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून कोरपनाचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, गडचांदूरचे मावळते ठाणेदार विलास चव्हाण, नवनियुक्त ठाणेदार गोपाल भारती, कोरपना ठाणेदार नरेंद्र कोसुरकर, पाटणचे ठाणेदार संदीप हिवाळे, जिवतीचे ठाणेदार सुमित खैरकार, पिटीगुडा ठाणेदार अनिल मालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील धोकटे, नासीर खान आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. गणेश मंडळांनी स्वच्छता उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, दारुबंदी उपक्रम, गुलाल मुक्त विसर्जन, सर्वधर्मसमभाव विषयक उपक्रम तसेच उत्कृष्ट देखावा करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, संचालन प्रा. आशिष देरकर यांनी तर आभार ठाणेदार गोपाल भारती यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस बांधवांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील तंटामुक्त समिती अध्यक्ष, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिक