शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल ग्राम योजनेला गतिमान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

चिमूर : शासनातर्फे ग्रामीण भागात निर्मल ग्राम योजनेतून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले; पण, कोरोनामुळे ही कामे ...

चिमूर : शासनातर्फे ग्रामीण भागात निर्मल ग्राम योजनेतून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले; पण, कोरोनामुळे ही कामे थंडावली. आता स्थिती बदलू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा स्थितीत काही नागरिक उघड्यावर शौचास जाऊन दुर्गंधीत भर घालत आहेत. निर्मल ग्राम योजना गतिमान केल्यास चित्र बदलू शकेल.

हॉस्पिटल वार्डात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

चंद्रपूर : शहरातील हॉस्पिटल वार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर सुरू आहे. याच परिसरात ज्युबिली हॉयस्कूल व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वसतिगृह असल्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरातही मोकाट कुत्री शिरकाव करतात. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावी

सिंदेवाही : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अवस्था बिकट आहे. रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत राहावे लागते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सरकार नगर परिसरातील खड्डे बुजवावे

चंद्रपूर : सरकार नगरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने खड्डे बुजवून समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गोंडपिपरीत प्रवाशांची गैरसोय

गोंडपिपरी : येथील बसस्थानक परिसरात एसटी कर्मचाऱ्यांसाठी असलेले एकमेव शौचालय वगळता सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिवहन मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

नाला घाणीने तुंबल्याने नागरिक हैराण

चंद्रपूर : शहरातील बंगाली वार्डातील नाला घाणीने तुंबल्याने नागरिक त्रस्त आहेत. बालाजी वार्डातही विविध ठिकाणी घाण साचली. नाल्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली. मनपाने तातडीने स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गडचांदूर-कोरपना रस्त्यांची दुरुस्ती करा

कोरपना : कोरपना ते गडचांदूर या मार्गाची दुरवस्था झाली. वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गडचांदूर येथे सिमेंट कंपन्या असल्यामुळे या मार्गावर नेहमीच जड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंटीकरण करून समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली,

तालुक्यात कृषिपूरक उद्योगांची गरज

कोरपना : तालुक्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. पण, हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाममार्गाला लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात आता रोजगार मिळणे कठीण झाले. शेतीवरील भार कमी करण्यासाठी सरकारने कृषिपूरक उद्योग सुरू करण्याची मागणी युवकांनी केली आहे.

बाबूपेठ परिसरात अतिक्रमण वाढले

चंद्रपूर : येथील बाबूपेठ, लालपेठ परिसरातील काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र, अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा

भद्रावती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

गावागावांत डास प्रतिबंधक फवारणी करावी

गोंडपिपरी : परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली होती. मात्र, आता ती बंद झाली आहे. डेंग्यू, मलेरिया असे आजार होण्याची भीती आहे.

प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : बंदी असूनही शहरात प्लास्टिक वापर सुरूच आहे. मोकाट जनावरे प्लास्टिक खात असल्याने आजारग्रस्त होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होतो. मनपाने कोरोनाविरुद्ध जागृती करताना प्लास्टिक पिशव्या वापरांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली.

प्रवासी निवारा दुरुस्ती करण्याची मागणी

राजुरा : चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवघाट, दुल्हेशाह बाबांच्या दर्ग्यासह माथा, कुसळ, आदी गावांकडे जाण्याऱ्या रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहून वाट पाहावी लागत आहे.