शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

१,४४५ शाळा सुरू, मात्र महाविद्यालये अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांचे समुपदेशन केले. परिणामी, विद्यार्थ्यांचा आता उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यात १३३ महाविद्यालये येतात. या महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू झाली. प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य केले. काही महाविद्यालयांमध्ये अध्यापनही सुरू झाले आहेत; मात्र बहुतांश महाविद्यालयात विद्यार्थीच उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

१६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनीही हाच मार्ग स्वीकारला. कोरोनाचा संसर्ग कमी झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी झाली. त्यामुळे पालक हमीपत्र भरून देत आहेत; परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या पालकांकडून हमीपत्र कसे भरून घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

कोरोनामुळे कुटुंबीयांनी महाविद्यालयात जाण्यासाठी सहमती दिली नाही. त्यामुळे मी घरीच राहून अभ्यास करतो. माझे बरेच वर्गमित्र याच पद्धतीने अभ्यास करीत आहेत. वर्गात येण्याबाबत कॉलेजकडूनही तगादा नाही. केवळ दिवस पुढे जात आहेत.

- श्रीकांत माहुरे, चंद्रपूर.

कोट

कॉलेजात येणारे विद्यार्थी कमी आहेत. तासिका होतात; पण म्हणावा तसा आनंद नाही. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मी कॉलेजात येत आहे. कोरोनामुळे बरेच जण पार्टटाइम रोजगाराकडे वळले. कुटुंबाची गरज म्हणून हे पाऊल उचलावे लागते.

कोट

मास्क लावून तासिका घेता येऊ शकतात. कॉलेजचे मुले-मुली सुजाण असतात. त्यांना चांगले व वाईट कळते. कॉलेज व विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पर्याय शोधला पाहिजे.

- यमक गोपुरे, विद्यार्थी हितकारिणी संघटना, चंद्रपूर.

कोट

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॉलेज व विद्यापीठाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मुले कॉलेजात येत नसतील त्यांच्या प्रोत्साहनासाठी पालकांची मदत घेतली पाहिजे; परंतु हातात हात ठेवून बसणे चुकीचे आहे.

-आकाश कांबळे, युवा प्रबोधिनी, बाबूपेठ, चंद्रपूर.