शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:27 IST

यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देआराखडा नाही, बैठकी ढेपाळल्या : दीड मीटरने विहिरींची पातळी खाली

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद उद्भवणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, पाणीटंचाई या भीषण समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यंत्रणांनी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला नाही, हे वास्तव आहे.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाइचे स्वरूप लक्षात घेता उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार पाणीपुरवठा निधीची तरतूद करून कृती आराखडा मंजूर केला जातो. परंतु यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला असताना प्रशासनाने आतापर्यत कृती आराखडा किंवा बैठकी घेण्याची तसदी घेतली नाही. येत्या काळात पाणीटंचाईचे गडद संकट असल्याचे संकेत भुवैज्ञानिकांनी दिले असताना प्रशासकीय यंत्रणा गाफील असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा अल्प आहे. भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. जिल्ह्यात १४४ निरिक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरिक्षण धक्कादायक आहे. असे असताना मेळघाटातील धारणी व चिखलदरा, वरूड, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीकडून संभाव्य पाणी टंचाईबाबत अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचा अंतिम आराखडा तयार झाला नसल्याचे वास्तव आहे. आराखडा तयार नाही. त्यामुळे जिल्हा पाणीटंचाईला जिल्हाधिकारी कशी मान्यता प्रदान करणार? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गतवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी युद्धस्तरावर बैठकी घेऊन आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यंदा पाणीटंचाई आराखड्याबाबत प्रशासकीय स्तरावर कमालीची शांतता आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल, असे संकेत मिळाले आहे.आराखड्याची रक्कम वाढण्याची शक्यतापाणीटंचाई आराखड्यात यंदा चारपट वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी आराखडयानुसार बहुतांश निधी खर्च झाला. मात्र, यावर्षी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता आराखड्याची रक्कम वाढेल, यात दुमत नाही. परंतु पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संंबंधित यंत्रणांकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सहा तालुक्याचा भूजलस्तर कमीजिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात भूजलस्तर घटला आहे. यात अचलपूर,चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली अमरावती आणि दर्यापूर या तालुक्यांचा समावेश आहे.चिखलदरा तालुक्याला टँकरने पाणीपुरवठाभूजलस्तर घटल्याचा सर्वाधिक फटका पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पस्तलई, लवादा, आलाडोह, भांदरी, ढोमणीफाटा, तारूबांदा, मोताखेडा या गावांना बसतो. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही परिस्थिती येत्या उन्हाळ्यात उद्भवणार, असे संकेत पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांकडून मिळाले आहे.जिल्ह्यातील १४ पैकी ९ पंचायत समितीकडून संभाव्य पाणीटंचाईचे अहवाल प्राप्त झाले. मात्र, वरूड, मोर्शी, धारणी, चिखलदरा व नांदगाव या पाच पंचायत समितींचे अहवाल मिळालेले नाहीत. त्यामुळे अंतिम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली नाही.- संजय येवले,कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, अमरावतीभूजल सर्वेक्षणांती अहवालानुसार दीड मीटर पाणी पातळी कमी झाली आहे. यात सहा तालुक्यांत पाणी टंचाईचा गंभीर सामना करावा लागेल. वरिष्ठांना संभाव्य पाणी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे.- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग