शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दहा बकऱ्या ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना तालुक्यातील भरोसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना तालुक्यातील भरोसा येथे ११ एप्रिलच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सदर हल्ला लांडग्यांनी केला असल्याची शक्यता वर्तविली जात असून, यामध्ये १० बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतीला जोड व्यवसाय करणारे शेतकरी समाधान थुट्टे यांचे सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे.

भरोसा येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान सदाशिव थुट्टे हे आपल्या गट नं. ३१९ मध्ये असलेल्या शेतातील गोठ्यात शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात. दरम्यान, शेतात पिके असल्यामुळे व बकऱ्यांचा सांभाळ करण्यासाठी रात्री ते गोठ्यातच मुक्कामाला होते. दरम्यान, ११ एप्रिलच्या सकाळी उठून गावात गेले असता शेतातील मका पिकात दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला चढवून गोठ्यातील ६ बोकड व ३ शेळ्यांना ठार केल्याचे उघडकीस आले. यामध्ये शेतकरी समाधान थुट्टे यांचे सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे. गोठ्यातील मृत बकऱ्यांची अवस्था पाहता सदरचा हल्ला लांडग्याने केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि, अंचरवाडी व भरोसा शिवारात दोन दिवसांपूर्वी चार लांडग्यांचा मुक्त वावर सुरू असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, याबाबत माहिती मिळाली असता महसूल विभागाच्या वतीने या भागाचे तलाठी हरिभाऊ उबरहंडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज रगतवान, वन विभागाचे मेरत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी शेख, डॉ. सुधाकर सुरडकर, पोलीस पाटील लक्ष्मण लेंढे, समाधान सदाशिव थुट्टे, संतोष थुट्टे, समाधान धोंडगे, साहेबराव थुट्टे, दिलीप थुट्टे, सागर थुट्टे, रघुनाथ थुट्टे, गणेश सिरसाठ आदी शेतकरी उपस्थित होते, तर या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, पत्रकार उद्धव थुट्टे, अ‍ॅड. गणेश थुट्टे, कार्तिक खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन धीर देण्यासह शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकऱ्याची चिंता वाढली

भरोसा भागात असलेला कालवा, तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे उपलब्ध जलसाठा आणि या जलसाठ्याच्या भरवशावरील उन्हाळी पिकांमुळे वन्यप्राण्यांना या भागात पाण्यासह चाराही उपलब्ध आहे. परिणामी रोही, हरिण, रानडुक्कर आदी पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना जागलीवर जावे लागते. त्यात आता लांडग्यांची भर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

कॅप्शन : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या बकऱ्यांची पाहणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकरी.

..............................