शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

By admin | Updated: September 5, 2015 00:01 IST

पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नाही.

बुलडाणा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, कार्यक्रमांचेही आयोजन होते; मात्र सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असते ती शिक्षक गौरव पुरस्काराची. ह्यजिल्हा आदर्श शिक्षकह्ण असे काही वर्षांंपूर्वी नामाभिधान असलेले हे पुरस्कार आता ह्यजिल्हा शिक्षक गौरवह्ण या नावाने दिले जात असले तरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान एक अशा १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ ऑगस्टपर्यंंत उपक्रमशील शिक्षकांचे प्रस्ताव आमंत्रित केले जातात. या प्रस्तावांवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यांच्या नेतृत्वातील समिती निर्णय घेते. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर पुरस्कारांचे वितरण केले जाते. सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराकरिता केवळ पाच प्रस्ताव आले. प्रस्तावांची ही संख्या लक्षात घेता, निवड समिती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्हाभरात नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेणार्‍या शिक्षकांनाही अशा पुरस्काराबाबत माहिती द्यावी व प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता शिक्षक गौरव पुरस्कारासाठी पुन्हा प्रस्ताव आमंत्रित केले असून, ३0 नोव्हेंबरपर्यंंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकदिनी हा सोहळा व्हावा, अशी इच्छा शिक्षकांची असली तरी त्यांच्याकडूनच प्रस्ताव नसल्यामुळे हा सोहळा आता नोव्हेंबर महिन्यात येणार्‍या राष्ट्रीय शिक्षकदिनी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्तावांची प्रक्रिया संपणार तरी कधी? उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना आपण केलेल्या कार्याचे सादरीकरण स्वत: करावे लागते. या सादरीकरणाच्या प्रस्तावावरच जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करते. आपण केलेल्या कामाचे आपणच कौतुक करण्यासारखा हा प्रकार अनेक चांगल्या शिक्षकांना आवडत नाही. त्यामुळे असे अनेक शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहतात. त्यामुळेच चांगल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावच सादर केले नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव मागविण्याची ही प्रक्रिया संपविण्याची गरज आता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक समिती गठित करुन, त्या समितीने चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन पुरस्कार दिला, तर ते अधिक प्रभावी ठरू शकते, अशी मागणी अनेक शिक्षकांची आहे.