शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सभा बारगळली हा पालिकेचा विषय : गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

बुलडाणा : जयस्तंभ चौकातील जागा ही यापूर्वीच वाणिज्य वापरासाठी नगर पालिकेने आरक्षित ठेवली आहे. त्या जागेवर पुतळा उभारण्यासाठी ठराव ...

बुलडाणा : जयस्तंभ चौकातील जागा ही यापूर्वीच वाणिज्य वापरासाठी नगर पालिकेने आरक्षित ठेवली आहे. त्या जागेवर पुतळा उभारण्यासाठी ठराव घेण्यापूर्वी त्या जागेचा आधी पर्पज चेंज करावा लागतो. शिवाय असा ठराव घेणे म्हणजे नगर पालिकेचे आर्थिक नुकसान होणार होते. ही बाब नगर सेवकांच्या लक्षात आल्यामुळेच काल नगर पालिकने बोलाविलेली विशेष सभा २६ विरुद्ध ६ मतांनी बारगळली. यामध्ये कोणत्याही नगरसेवकावर दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती आ. संजय गायकवाड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

मागील एक महिन्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयस्तंभ चौकात उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवरून वादंग सुरू होते. या संदर्भात ८ एप्रिल रोजी नगरपालिकेने विशेष सभा बोलावून पुतळ्याच्या जागेचा विषय पटलावर घेतला. मात्र ही सभा कोरमअभावी रद्द झाल्यानंतर शहरवासीयांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आ. गायकवाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाला पूर्णविराम दिला. यावेळी कुणाल गायकवाड, स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. सुमित सरदार, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, सचिव अशोक इंगळे, उपाध्यक्ष दादाराव गायकवाड, दिलीप दौलतराव जाधव, प्रा. एस. पी. हिवाळे, अनिल आराख उपस्थित होत. आ. गायकवाड यांनी पूर्वीच्या जागेवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून टेंडर प्रोसेस झाली. पुतळ्याची ऑर्डरही दिली आणि समाजाच्या धम्मदानातून हा पुतळा उभा राहत असून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जयंतीदिनी या जागेवर भूमिपूजनही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष सिद्धार्थ आराख, नितीन शिरसाट, सुमित गायकवाड, बाला राऊत, दीपक मनवर उपस्थित होते.