शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संकटातही सावरल्या पेरण्या!

By admin | Updated: August 26, 2015 00:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली.

बुलडाणा : ऐनपेरणीच्या हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकर्‍यांसाठी हे अस्मानी संकट नवीन नाही; परंतु यात सुलतानी संकटांची भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले; मात्र शेतकर्‍यांनी या सर्व गोष्टीला सामोरे जात संकटाच्या काळातही आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोजून चार-पाच दिवसात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच दुष्काळाचे ग्रहण लागले होते. पावसाच्या आशेवर बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत; मात्र पुढे पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला. पाण्याअभावी उभी पिकेही वाळून गेली. या आस्मानी संकटाबरोबरच शेतकर्‍यांपुढे सुलतानी संकटेही उभी राहिली. यंदा विविध बँकांनी थकीत कर्जदार शेतकर्‍यांना ऐनपेरणीच्या काळात कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहणे, जिल्हा प्रशासनाने कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय वेळेवर घेतला असता, तर शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळाला असता. यामुळे जिल्ह्यात पेरण्या लांबल्या. ३0 जूनपयर्ंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पावसाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे बळीराज्याचे मनोधैर्य खचल्यामुळे गत चार महिन्यात जिल्ह्यातील ११ शेतकर्‍यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकाराला; मात्र या पाचवीला पुजलेल्या संकटावरही मात करून आजपर्यंंत ७ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे.